शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याची उमेद - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती ...

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती झाली होती जेव्हा कोरोनाचा विषाणू दूर कुठेतरी वुहान प्रांतात धुमाकूळ घालत होता. तो जोपर्यंत आपल्या गावाच्या वेशीबाहेर आला नव्हता, तोपर्यंत सगळं आलबेल होतं; आणि मग एक दिवस अचानक लाॅकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषध, वैद्यकीय व्यवस्था, पीपीई किट यांसाठी धावाधाव सुरू झाली; पण यावेळी माणसाच्या लढाऊवृत्तीचा पुन:प्रत्यय आला. संपूर्ण मानवसमाज एक होऊन या जागतिक प्रलयंकारी संकटाशी लढताना दिसला. प्रत्येकजण आपापल्या परीने पर्याय शोधू लागला. जगण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरीब, असाहाय्य जनतेच्या मदतीला लोक उभे राहू लागले. स्थलांतरित होणाऱ्यांना कोणी खायला दिले, कोणी पाणी दिलं, कोणी जमेल तेवढी वाहतूक व्यवस्था केली. कोरोनाच्या साथीत हार न मानता कोणी घरात बसून, कोणी रस्त्यावर उतरून सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन केले. पहिल्यांदा पंधरा दिवसांसाठी सुरू केलेला लाॅकडाऊन वाढत गेला. दिलेल्या सूचना पाळून लोकांनी घरी शांत बसणे पसंत केले; पण कोरोनाचा प्रभाव काही कमी होताना दिसत नव्हता. फैलाव वाढत गेला तसा लाॅकडाऊन वाढत गेला. दूरवर शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांनी गावी जाणे सुरू केले. या स्थलांतरात काही दुर्घटना घडल्या तशी समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी आपली झोळी रिकामी करायला सुरुवात केली. काही विक्षिप्त लोकांनी कमरेला अमरत्वाचा पट्टा बांधून जणू आपण अनादिकाळापर्यंत जगणार आहोत, या अविर्भावात लुटालूट सुरू केली. मिळेल त्या मार्गाने कमाई केली तरी लोकांनी जगण्याचा संघर्ष थांबवला नाही.

एखादी अवघड चढण चढून डोंगरमाथ्यावर आल्यावर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होईल, या आशेवर घसा सुकला, हातपाय थकले, अंगातील त्राण संपले तरी डोंगर चढून वर आलो आणि समोर खोल दरी दिसावी. त्याच्या पलीकडे जंगल आणि त्यांच्या पलीकडे पुसटशी कल्पना येईल, अशा पद्धतीने आपले ध्येय दिसले. आता उडी मारून कडेलोट करून जीवनयात्रा संपवायची नाही. कडेकपारीतून सरपटत खाली उतरावे. किती ओरखडले, कितीही दमलो, थकलो, कितीही असह्य झाले तरी हार न मानता मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहावं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून मार्गाक्रमण करीत राहावे. थांबावे, विचार करावा, विसावा घेऊन पुन्हा चालत राहावं ही जगण्याची उमेद आपल्याला कोरोनाच्या जंगलातून बाहेर घेऊन येत असताना दिसत आहे. या कठीण काळात काही चुका झाल्या. काही लोक चुकीचे वागले; पण मानवी गुणवैशिष्ट्यांनुसार चांगले ते धरावे. वाईट ते सोडून द्यावे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालत पुढे सरकत राहावं.

कोरोनाच्या काळात अनेक जणांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. सगळ्यात पहिला फटका बसला शेतकरी आणि पोल्ट्रीमालक यांना. अचानक सगळे ठप्प झाले; त्यामुळे शेतमाल तोडणी, वाहतूक आणि वितरण थांबले. भाजीपाला अक्षरशः शेतात सडून गेला. कोणीतरी आवई उठवली की, कोरोना चिकन खाल्ल्याने होतो. क्षणात चिकनचे दर कवडीमोल झाले. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारे, रोजंदारी मजूर, रिक्षाचालक यांची कुचंबणा झाली. त्यांना काही प्रमाणात शासकीय मदत रेशन आणि आर्थिक स्वरूपात आली. ज्यांनी उधारीवर माल विकला होता, असे व्यापारी अडचणीत आले; कारण काहीजण व्यवसाय सोडून परराज्यांत निघून गेले. तिथे उधारी बुडाली. अचानक आलेल्या दवाखान्याच्या बिलाची रक्कम बघून भलेभले घायकुतीला आले. उद्योग व्यवसाय बंद. कमाईच्या वाटा थांबलेल्या. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. दवाखान्याची बिलं डोंगराएवढी. लोकांनी पै पै करून साठवलेली जमापुंजी अवघ्या काही दिवसांत संपली. सुरुवातीला तर सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगारकपातीला सामोर जावे लागले; पण नंतर स्थिरस्थावर झाले. काही खासगी क्षेत्रातील लोकांना रोजगार गमवावा लागला. काहीजणांना पगार कपात झाली, तर काही ठिकाणी दिरंगाई होत होती. जितकी झळ शेतकरी आणि व्यावसायिक यांना बसली त्या तुलनेत नोकरदारांना त्रास कमी जाणवला. असंघटित आणि अकुशल कामगारांना चांगलाच फटका बसला.