शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण आणि बोचणाऱ्या वाऱ्याने अंंगात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:51 IST

ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण आणि बोचणाऱ्या वाऱ्याने अंंगात हुडहुडीयंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच

कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच पहावयास मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक पावसानंतर थंडीही तेवढीच असेल असे वाटत होते. मात्र, नोव्हेंबरअखेर परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. त्यानंतर काही दिवस थंडी जाणवली; मात्र त्यामध्ये तीव्रता नव्हती.

जानेवारी महिन्यातही थोडे दिवस ढगाळ वातावरण तर काही दिवस थंडी असेच राहिले. फेबु्रवारी उजाडल्याने उष्णता वाढू लागेल, असे वाटत असतानाच गेली दोन दिवस अचानक बदल झाला. रविवारी पहाटेपासून थंड वारे वाहू लागले. दिवसभर वाऱ्यांची झुळूक राहत असल्याने अंगातून थंडी जात नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी अधिकच जाणवू लागली.

रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान १७ डिग्रीपर्यंत आले होते; त्याचबरोबर ढगाचे आच्छादन दिवसभर राहिले. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे; मात्र पुन्हा ढगाळ वातावरण व्हायचे.

उत्तर व पूर्व भारतात सध्या पाऊस पडत आहे; त्याचा परिणाम हवामान बदलावर झाला आहे. उन्हाळ्या अगोदर थंड वारे वाहत असते; त्यामुळे आगामी तीन दिवस असेच ढगाळ वातावरणासह वारे वाहील, असा अंदाज आहे.

शनिवारनंतर कडक ऊनशुक्रवार (दि. १४) पर्यंत हवामान थंड राहणार आहे. मात्र, शनिवारनंतर तापमानात वाढ होणार आहे. ३६ डिग्रीपर्यंत तापमान जाणार असल्याने उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदल ही उन्हाळ्याची चाहूल आहे. तीन-चार दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता असून, हलका वळवाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. जय सामंत, पर्यावरण शास्त्रज्ञ 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर