शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या मैदानातील लढाई निकराची होणार-- गारगोटी गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:51 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या ...

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, बजरंग देसाई यांच्या गावांचा समावेशभाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते.जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या लढाईचा गट म्हणून गाजणार आहे. या गटात सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, माजी आमदार के. पी. पाटील यांची मक्तेदारी आमदार आबिटकर मोडून काढणार? की के. पी. पाटील विजयाची हॅट्ट्रिक करणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

एकूण सहा गटांपैकी या गटातील निवडणूक ही निकालाच्या निकालाची ठरणार आहे. एकूण पाच जागांसाठी या गटातून निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याला अध्यक्षपदी विराजमान करणाºया गटाची मुख्य भूमिका बजावणारा गट. याशिवाय सर्वांत जास्त निकराची आणि अटीतटीची निवडणूक दाखवून देणारा गट, अशा अनेक घटनांचा ऐतिहासिक साक्षीदार बनणारा हा गट आहे. गट नंबर पाच आणि उमेदवारांची संख्यादेखील पाच होण्याची शक्यता आहे.

या गटावर माजी आमदार के. पी. पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांत माजी आमदार गट विजयी होत आला आहे. मागील निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात माजी आमदार बजरंग देसाई आणि जि. प. माजी उपाध्यक्ष बाबूराव आण्णा देसाई यांच्यात लढत झाली होती. यात के. पी. पाटील यांनी तब्बल सहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, तर अनुसूचित जातीच्या गटातून सुनीलराव कांबळे यांनी बाजी मारली होती. पंडितराव केणे, सुनील कांबळे यांनी सलग दहा वर्षे संचालक म्हणून या गटाचे नेतृत्व केले आहे. गतविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाने राष्ट्रवादीला रामराम केल्याने दोलायमान स्थिती निर्माण झाली होती, परंतु कारखान्यावर के. पी. पाटील गटाने निविर्वाद सत्ता प्रस्थापित केली होती. हे संदर्भ पाहता आमदार के. पी. पाटील यांना शह देण्यासाठी तगडे उमेदवार उभे करणे आवश्यक झाले आहे.

यावेळी के. पी. पाटील यांची युती भाजपशी झाल्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई आणि राहुल देसाई यांच्या गटाची अतिरिक्त ताकद मिळणार आहे. त्यामुळे या गटात स्वत: के. पी., शिवराज देसाई, मधुकर देसाई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर आमदार आबिटकर गटातून बी. एस. देसाई, कल्याण निकम, दत्ताजीराव उगले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. सयाजी देसाई अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांच्या गटाने आमदार प्रकाश आबिटकर गटाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेसची काही मते विभागली जाणार आहेत. काही मते माजी आमदार बजरंग देसाई गटाला जातील. नेहमीप्रमाणे काँग्रेसचे मतदार विभागले जाण्याचा इतिहास कायम राहणार आहे.के. पी. पाटील गटातून अनेक इच्छुक आहेत. यामध्ये माजी संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य जीवनराव पाटील, पंडितराव केणे, विजय आबिटकर, शेखर देसाई, सुनील कांबळे, मधुकर जाधव, तर भाजपचे जयवंतराव चोरगे, विद्या नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, हिंदुराव पाटील, धोंडिराम मगदूम ही नेतेमंडळी इच्छुक आहेत. भाजपला सहा जागा देण्याच्या अटीमुळे इथे कदाचित एक जागा ते मागू शकतात. असे झाल्यास राष्ट्रवादीची एक जागा कमी होणार आहे. भाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते. असे झाल्यास इच्छुक नाराजांची एक फळी निर्माण होणार असून त्यांची समजूत घालताना नेते मंडळींना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे जागा वाटपात बºयाच उलथापालथी होण्याचे संकेत आहेत, तर राष्ट्रवादीच्या अस्मितेसाठी लढलेल्या जि. प.च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार विजय आबिटकर यांना संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गटात बारा हजार आठशे चौºयान्नव मतदार संख्या आहे. गारगोटी, मडीलगे बुद्रुक, वाघापूर, गंगापूर, कूर, पुष्पनगर ही मोठी मतदारसंख्या असलेली गावे आहेत. या गावांतील उमेदवार नसणे हे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. गारगोटी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी एक जागा गरजेची आहे. कारण गारगोटी येथील दोन्ही बलाढ्य गटांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे.के. पी. पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या गटात आमदार प्रकाश आबिटकर शह देण्यासाठी तगडे उमेदवार आणि जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी करीत आहेत. त्यांच्या व्यूहरचनेत सचिन घोरपडे व इतर काँग्रेस नेतेमंडळी मदत करीत आहेत. आमदार आबिटकर गटातून माजी सभापती नंदकुमार ढेंगे, वसंतराव प्रभावळे, माजी संचालक दिनकर कांबळे, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, आर. जी. पाटील, विक्रम पाटील हे इच्छुक आहेत.

बजरंग देसाई गटाची या गटात निर्णायक ताकद असल्याने भाजपला हा गट अतिशय पूरक आहे. येथे दोन जागा घेतल्यास कारखान्याला प्रतिनिधी पाठविताना सुवर्णसंधी असलेला हा गट आहे. ते या संधीचा फायदा निश्चितच उठवतील.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार आबिटकर गटातून पराभव झालेले मधुकर देसाई हे आता के. पी. पाटील गटातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही निवडणुकीदरम्यान कमी कालावधीत परस्परविरोधी गटातून निवडणूक लढवण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.अशा अनेक संदर्भाने हा गट विशेष महत्वाचा घटक ठरणांर आहे.गटात एकावन्न गावे : आकुर्डे, महालवाडी, म्हसवे, गिरगाव, हेदवडे, निळपण, दारवाड, पाचवडे, मिणचे खुर्द, भाटीवडे, नाधवडे, कूर, कोनवडे, मुदाळ, व्हनगुत्ती, वाघापूर, गंगापूर, पळशिवणे, मडीलगे बुद्रुक, मडीलगे खुर्द, कलनाकवाडी, आदमापूर, मोरेवाडी, बसरेवाडी, गारगोटी, सोनाळी, सालपेवाडी, फणसवाडी, पुष्पनगर, खानापूर, कोळवण, बारवे, मुरुक्टे, दिंडेवाडी, पांगिरे, नागणवाडी, मानवळे, पिंपळगाव, बेगवडे, टिक्केवाडी, आंबवणे, मिणचे बुद्रुक, लोटेवाडी, पंडिवरे, नांगरगाव, भेंडवडे, हेळेवाडी, आरळगुंडी, बामणे, बेडीव, शिंदेवाडी, पाल, पाळेवाडी, हणबरवाडी, नवरसवाडी.तेरा हजार मतदार  या गटात एकावन्न गावे असून, बारा हजार आठशे चौºयानव्व मतदार आहेत. के. पी. पाटील यांनी अनेक पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघाचे नेतृत्व केले आह,े तर पंधरा वर्षे अध्यक्षपदी विराजमान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कारखान्याला अध्यक्ष देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार की खंडित होणार हे येत्या निवडणुकीत सिद्ध होईल.गत निवडणूक दृष्टिक्षेपउमेदवार आणि मिळालेली मतेके. पी. पाटील २२०५२, पंडितराव केणे १९८५६, बी. एस. देसाई १६०९५, बजरंग देसाई १५६०४, सुनील कांबळे संस्था गटचारशेपेक्षा जास्त मतदार संख्या असलेली गावे :आकुर्डे, म्हसवे, नाधवडे, कूर, मुदाळ, वाघापूर, गंगापूर, मडीलगे बुद्रुक, गारगोटी.