शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

घरच्या मैदानातील लढाई निकराची होणार-- गारगोटी गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:51 IST

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या ...

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, बजरंग देसाई यांच्या गावांचा समावेशभाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते.जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी

नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावांचा समावेश असलेला हा गट निकराच्या लढाईचा गट म्हणून गाजणार आहे. या गटात सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, माजी आमदार के. पी. पाटील यांची मक्तेदारी आमदार आबिटकर मोडून काढणार? की के. पी. पाटील विजयाची हॅट्ट्रिक करणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

एकूण सहा गटांपैकी या गटातील निवडणूक ही निकालाच्या निकालाची ठरणार आहे. एकूण पाच जागांसाठी या गटातून निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याला अध्यक्षपदी विराजमान करणाºया गटाची मुख्य भूमिका बजावणारा गट. याशिवाय सर्वांत जास्त निकराची आणि अटीतटीची निवडणूक दाखवून देणारा गट, अशा अनेक घटनांचा ऐतिहासिक साक्षीदार बनणारा हा गट आहे. गट नंबर पाच आणि उमेदवारांची संख्यादेखील पाच होण्याची शक्यता आहे.

या गटावर माजी आमदार के. पी. पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांत माजी आमदार गट विजयी होत आला आहे. मागील निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात माजी आमदार बजरंग देसाई आणि जि. प. माजी उपाध्यक्ष बाबूराव आण्णा देसाई यांच्यात लढत झाली होती. यात के. पी. पाटील यांनी तब्बल सहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, तर अनुसूचित जातीच्या गटातून सुनीलराव कांबळे यांनी बाजी मारली होती. पंडितराव केणे, सुनील कांबळे यांनी सलग दहा वर्षे संचालक म्हणून या गटाचे नेतृत्व केले आहे. गतविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाने राष्ट्रवादीला रामराम केल्याने दोलायमान स्थिती निर्माण झाली होती, परंतु कारखान्यावर के. पी. पाटील गटाने निविर्वाद सत्ता प्रस्थापित केली होती. हे संदर्भ पाहता आमदार के. पी. पाटील यांना शह देण्यासाठी तगडे उमेदवार उभे करणे आवश्यक झाले आहे.

यावेळी के. पी. पाटील यांची युती भाजपशी झाल्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई आणि राहुल देसाई यांच्या गटाची अतिरिक्त ताकद मिळणार आहे. त्यामुळे या गटात स्वत: के. पी., शिवराज देसाई, मधुकर देसाई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर आमदार आबिटकर गटातून बी. एस. देसाई, कल्याण निकम, दत्ताजीराव उगले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. सयाजी देसाई अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांच्या गटाने आमदार प्रकाश आबिटकर गटाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेसची काही मते विभागली जाणार आहेत. काही मते माजी आमदार बजरंग देसाई गटाला जातील. नेहमीप्रमाणे काँग्रेसचे मतदार विभागले जाण्याचा इतिहास कायम राहणार आहे.के. पी. पाटील गटातून अनेक इच्छुक आहेत. यामध्ये माजी संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य जीवनराव पाटील, पंडितराव केणे, विजय आबिटकर, शेखर देसाई, सुनील कांबळे, मधुकर जाधव, तर भाजपचे जयवंतराव चोरगे, विद्या नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, हिंदुराव पाटील, धोंडिराम मगदूम ही नेतेमंडळी इच्छुक आहेत. भाजपला सहा जागा देण्याच्या अटीमुळे इथे कदाचित एक जागा ते मागू शकतात. असे झाल्यास राष्ट्रवादीची एक जागा कमी होणार आहे. भाजपचा बºयापैकी हा गट प्रभाव क्षेत्रात असल्याने भाजप हमखास एक जागा अथवा दोन जागा घेऊ शकते. असे झाल्यास इच्छुक नाराजांची एक फळी निर्माण होणार असून त्यांची समजूत घालताना नेते मंडळींना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे जागा वाटपात बºयाच उलथापालथी होण्याचे संकेत आहेत, तर राष्ट्रवादीच्या अस्मितेसाठी लढलेल्या जि. प.च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार विजय आबिटकर यांना संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गटात बारा हजार आठशे चौºयान्नव मतदार संख्या आहे. गारगोटी, मडीलगे बुद्रुक, वाघापूर, गंगापूर, कूर, पुष्पनगर ही मोठी मतदारसंख्या असलेली गावे आहेत. या गावांतील उमेदवार नसणे हे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. गारगोटी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी एक जागा गरजेची आहे. कारण गारगोटी येथील दोन्ही बलाढ्य गटांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे.के. पी. पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या गटात आमदार प्रकाश आबिटकर शह देण्यासाठी तगडे उमेदवार आणि जोरदार मोर्चेबांधणी करून चारीमुंड्या चीत करण्यासाठी अंतर्गत बांधणी करीत आहेत. त्यांच्या व्यूहरचनेत सचिन घोरपडे व इतर काँग्रेस नेतेमंडळी मदत करीत आहेत. आमदार आबिटकर गटातून माजी सभापती नंदकुमार ढेंगे, वसंतराव प्रभावळे, माजी संचालक दिनकर कांबळे, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, आर. जी. पाटील, विक्रम पाटील हे इच्छुक आहेत.

बजरंग देसाई गटाची या गटात निर्णायक ताकद असल्याने भाजपला हा गट अतिशय पूरक आहे. येथे दोन जागा घेतल्यास कारखान्याला प्रतिनिधी पाठविताना सुवर्णसंधी असलेला हा गट आहे. ते या संधीचा फायदा निश्चितच उठवतील.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार आबिटकर गटातून पराभव झालेले मधुकर देसाई हे आता के. पी. पाटील गटातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही निवडणुकीदरम्यान कमी कालावधीत परस्परविरोधी गटातून निवडणूक लढवण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.अशा अनेक संदर्भाने हा गट विशेष महत्वाचा घटक ठरणांर आहे.गटात एकावन्न गावे : आकुर्डे, महालवाडी, म्हसवे, गिरगाव, हेदवडे, निळपण, दारवाड, पाचवडे, मिणचे खुर्द, भाटीवडे, नाधवडे, कूर, कोनवडे, मुदाळ, व्हनगुत्ती, वाघापूर, गंगापूर, पळशिवणे, मडीलगे बुद्रुक, मडीलगे खुर्द, कलनाकवाडी, आदमापूर, मोरेवाडी, बसरेवाडी, गारगोटी, सोनाळी, सालपेवाडी, फणसवाडी, पुष्पनगर, खानापूर, कोळवण, बारवे, मुरुक्टे, दिंडेवाडी, पांगिरे, नागणवाडी, मानवळे, पिंपळगाव, बेगवडे, टिक्केवाडी, आंबवणे, मिणचे बुद्रुक, लोटेवाडी, पंडिवरे, नांगरगाव, भेंडवडे, हेळेवाडी, आरळगुंडी, बामणे, बेडीव, शिंदेवाडी, पाल, पाळेवाडी, हणबरवाडी, नवरसवाडी.तेरा हजार मतदार  या गटात एकावन्न गावे असून, बारा हजार आठशे चौºयानव्व मतदार आहेत. के. पी. पाटील यांनी अनेक पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघाचे नेतृत्व केले आह,े तर पंधरा वर्षे अध्यक्षपदी विराजमान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कारखान्याला अध्यक्ष देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार की खंडित होणार हे येत्या निवडणुकीत सिद्ध होईल.गत निवडणूक दृष्टिक्षेपउमेदवार आणि मिळालेली मतेके. पी. पाटील २२०५२, पंडितराव केणे १९८५६, बी. एस. देसाई १६०९५, बजरंग देसाई १५६०४, सुनील कांबळे संस्था गटचारशेपेक्षा जास्त मतदार संख्या असलेली गावे :आकुर्डे, म्हसवे, नाधवडे, कूर, मुदाळ, वाघापूर, गंगापूर, मडीलगे बुद्रुक, गारगोटी.