शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापुरात पारंपारिक पद्धतीने घरगुती गौरी गणपती विसर्जन सुरु, बाप्पांच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी

By भारत चव्हाण | Updated: September 5, 2022 17:12 IST

कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात घरगुती ...

कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात घरगुती गौरी गणपतींचे आज, सोमवार सकाळपासून विसर्जन सुरु झाले. महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी केलेल्या आवाहनास साथ देत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे पंचगंगा नदी तसेच तलावात विसर्जन न करता कृत्रिम कुंडातून विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात घराघरातून विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली होती. रोजची पूजा, आरती, विविध प्रकारचे नैवेद्य यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीरसातून न्हावून गेले होते. सोमवार उजाडला तसा गणेशभक्तांना हुरहुर लागून राहिली. घरगुती गौरी, गणपतींचे विसर्जनास सकाळपासूनच सुरवात झाली. परंतु दुपारनंतर लोक मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले. रात्रीच्यावेळी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते.

ढोल, तासे, बॅंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चिरमुरे, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर अशा उत्साही वातावरणात, जल्लोषात विसर्जन सोहळा सुरु आहे. पारंपरिक वेशभूषा, डोकीवर भगवी भरजरी टोप्या, फेटे परिधान केलेले भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष: महिलांही मोठ्या संख्येने गौराईची गाणी म्हणत विसर्जनाच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे म्हणून संपूर्ण शहरात १८० कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या मंडळाच्या आवारात पाण्याच्या काहिली ठेवल्या आहेत. गणेशभक्तांनी या उपक्रमास साथ देत आपल्या मूर्ती या कृत्रिम कुंडात विसर्जत करत होते. नंतर महापालिकेचे कर्मचारी या मूर्ती रंकाळा तलावाच्या पश्चिमेला असलेल्या इराणी खणीत सोडत होते.

इराणी खण, रंकाळा तलाव, कोटीतिर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा परिसरात मोठी गर्दी होत आहे. तेथे मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जन केल्या जात आहेत. पंचगंगा नदी घाटावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते. तो परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. त्याठिकाणी ठेवलेल्या कृत्रिम कुंडातच मूर्ती विसर्जित केल्या जात आहेत.

स्वयंचलित यंत्रणा कार्यन्वीत

महानगरपालिका प्रशासनाने इराणी खणीत मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेचा जलद गतीनेमूर्ती विसर्जनास मदत होत आहे. सुमारे ८० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणेवर तासाला तीन हजार मूर्ती विसर्जित होतात.

बाप्पाला निरोप देताना मेघराजाची हजेरी

कोल्हापूर शहरातील वातावणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. वातावरण ढगाळ आहे. अधून मधून मेघराजाही आपली हजेरी लावत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत शहरात दोन वेळा पाऊस पडला. अशाही वातावरणात गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव