शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

सेनेच्या दुखण्यावर ‘पोकळ’ मलमपट्टीच हतबल

By admin | Updated: May 24, 2014 01:16 IST

नेतृत्व : प्रतिमा मलीन तरीही सबुरीचा सल्ला

कोल्हापूर : महत्त्वाकांक्षी शिवसैनिकांमुळे जिल्ह्यातील शिवसेना पुरती पोखरली असताना पक्षनेतृत्वाकडून केवळ पक्षाची शिस्त बाळगा, असा निरोप धाडून वादावर पडदा टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नाने सामान्य शिवसैनिक हवालदिल झाला आहे. शिवसेनेतील व्यक्तिगत वादामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असताना आणि अब्रू चव्हाट्यावर येत असतानाही पक्ष नेतृत्वाने कारवाई करण्याऐवजी त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले जात असले तरी अशाने अंतर्गत वादाने भविष्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता जुन्या तसेच निष्ठावंत शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. अशा पोकळ प्रयत्नांतून काहीच साध्य होणार नाही, अशी शिवसैनिकांची धारणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटायला लागले. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव का झाला, याची कारणमीमांसा पक्षपातळीवरून कोणीही केली नसताना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि आमदार यांनी मात्र पराभवास कोण कारणीभूत आहे याची जाहीर चर्चा, मेळावे, पत्रकार बैठका घेऊन करायला लागले. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेची चांगलीच करमणूक झाली, त्यामुळे शिवसेनेची कधी नाही ती बदनामी या लोकसभा निवडणुकीत झाली. तरीही शिवसेनेचे मुंबईतील नेते मात्र अद्याप गप्पच आहेत. पक्षशिस्त पाळा, शांत रहा, असा सबुरीचा सल्ला देत आहेत. कोल्हापुरातील स्थापनेपासूनच शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. आधी सुरेश साळोखे व कै. शिवाजीराव चव्हाण यांच्यात गटबाजी सुरू झाली. त्यानंतरच्या काळात रामभाऊ चव्हाण व सुरेश साळोखे यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर जिल्ह्यात आमदार गट आणि जिल्हा प्रमुख गट अशा सरळ दोन गटांत शिवसेना विभागली ती आजअखेर तशीच आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वादाने तर सीमा ओलांडली. त्यांच्यातील वादशहराची आमदारकी व त्यानंतरचे व्यवहारिक मतभेद यातून निर्माण झाले आहेत. दोघेही एकाच गुहेतील असल्याने दोघांचे कार्य आणि कर्तृत्व एकमेकांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्यातूनही हे वाद विकोपाला गेले आहेत. त्यातून दोघांच्या निष्ठेबद्दल आणि व्यवहाराबद्दल सामान्य शिवसैनिकांना शंका येत आहे,. या वादावर शिवसेना नेतृत्वाने तोडगा काढला नाही, तर त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होतील, अशी भीती शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.