शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

शेट्टींची ‘महायुती’ला सुटी?

By admin | Updated: August 24, 2014 00:48 IST

शिवसेनेकडून अवमान : जागा देण्याबाबत ताठर भूमिका

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी आकारास आलेल्या पाच पक्षांच्या महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याचा महायुतीला चांगलाच दणका बसणार आहे. जागा वाटपांबाबत एक सप्टेंबरपर्यंत काय घडते, हे पाहून त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेना खासदार शेट्टी यांना विधानसभेच्या अवघ्या चार ते पाचच जागा सोडायला तयार आहे. शेट्टी यांनी ३८ उमेदवारांची यादीच महायुतीला दिली आहे. त्यात पुढे-मागे होण्याची त्यांची तयारी आहे; परंतु चार-दोन जागा देणार असाल, तर मग कशाला महायुती, असा संघटनेचा सवाल आहे. त्यातून मुख्यत: शेट्टी व शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भाजप त्याकडे नुसते लांबून पाहत आहे. महायुतीला आम्ही लोढणे वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आमचा मार्ग मोकळा असल्याचे शेट्टी यांनी जुलैमध्येच स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२ जागांवर दणदणीत विजय मिळाला. त्यामध्ये खासदार शेट्टी यांची जागाही शिवसेनेच्याच कोट्यातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची लाट निर्माण झाल्यावर हा एकतर्फी निकाल लागला. त्यामुळे विधानसभेला शिवसेना-भाजप हे घटक पक्ष स्वाभिमानीसह रासप व रिपब्लिकन पक्षाच्या आठवले यांना फारसे बेरजेतच धरायला तयार नाहीत. कमी जागा देऊन अपमान करायचा व स्वाभिमानीने आदळआपट करून स्वत:च बाहेर पडावे, असे शिवसेनेचे धोरण दिसत असल्याची संघटनेची तक्रार आहे. शिवसेना नेते रामदास आठवले यांनीही निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा वाटप होईल. ते संघटनेला मान्य नसेल, तर खासदार शेट्टी यांनी महायुतीत राहायचे की नाही, हे ठरवावे असे काल, शुक्रवारीच मुंबईत जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील अस्वस्थताही वाढली आहे.शिवसेना संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शिरोळ व चंदगड या दोनच जागा सोडायला तयार आहे. या दोन जागा संघटनेच्या हक्काच्याच आहेत. त्याबाबत ‘माळावर शंख करायला पाटलांची परवानगी कशाला लागते.’ अशी संघटनेची भूमिका आहे. शेट्टी स्वत: खासदार आहेत व लोकसभेला किमान दहा विधानसभा मतदारसंघात त्यांना व सदाभाऊ खोत यांना मताधिक्क्य मिळाले आहे. लढाऊ कार्यकर्त्यांची फौज हे संघटनेचे बलस्थान आहे. त्यामुळे राज्यातील चार-पाच जागा मिळणार असतील तर त्यापेक्षा स्वतंत्र लढलेले बरे, असा संघटनेचा पवित्रा आहे. त्यादृष्टीने शेट्टी यांनी चाचपणीही सुरू केली आहे. जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढण्याची संघटनेची तयारी आहे. ऊस आंदोलनातील यशामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सहा-सात जिल्ह्यांत प्रत्येक मतदारसंघात संघटनेला मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यांची निवडून येण्याची क्षमता नसली, तरी त्या मतदारसंघात कुणाचा पराभव करायचा हे ठरविण्याइतकी संघटनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेमागून फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास दोन्ही काँग्रेसमधील नाराजांचाही पाठिंबा मिळू शकतो, असा संघटनेचा होरा आहे.संघटनेची ‘ताकद’ काय...भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीत या, असे जाहीर निमंत्रण दिल्याने मी त्यामध्ये सहभागी झालो आहे. त्यामुळे महायुतीला आता जर आम्ही नको असेल, तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. जबरदस्तीने कुणाच्या गळ्यात पडण्याचा आमचा स्वभाव नाही. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे, हे आमची ताकद विचारणाऱ्यांनी विसरू नये.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना४राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्रमक हल्ला४शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य४लढाऊ कार्यकर्ते४ऊस आंदोलनातील यश४ग्रामीण प्रश्नांची चांगली जाण४मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीकडे शेट्टी यांच्याशिवाय ग्रामीण भागात प्रभाव असलेला नेता नाही.