शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शेट्टींची ‘महायुती’ला सुटी?

By admin | Updated: August 24, 2014 00:48 IST

शिवसेनेकडून अवमान : जागा देण्याबाबत ताठर भूमिका

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी आकारास आलेल्या पाच पक्षांच्या महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याचा महायुतीला चांगलाच दणका बसणार आहे. जागा वाटपांबाबत एक सप्टेंबरपर्यंत काय घडते, हे पाहून त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेना खासदार शेट्टी यांना विधानसभेच्या अवघ्या चार ते पाचच जागा सोडायला तयार आहे. शेट्टी यांनी ३८ उमेदवारांची यादीच महायुतीला दिली आहे. त्यात पुढे-मागे होण्याची त्यांची तयारी आहे; परंतु चार-दोन जागा देणार असाल, तर मग कशाला महायुती, असा संघटनेचा सवाल आहे. त्यातून मुख्यत: शेट्टी व शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भाजप त्याकडे नुसते लांबून पाहत आहे. महायुतीला आम्ही लोढणे वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आमचा मार्ग मोकळा असल्याचे शेट्टी यांनी जुलैमध्येच स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२ जागांवर दणदणीत विजय मिळाला. त्यामध्ये खासदार शेट्टी यांची जागाही शिवसेनेच्याच कोट्यातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची लाट निर्माण झाल्यावर हा एकतर्फी निकाल लागला. त्यामुळे विधानसभेला शिवसेना-भाजप हे घटक पक्ष स्वाभिमानीसह रासप व रिपब्लिकन पक्षाच्या आठवले यांना फारसे बेरजेतच धरायला तयार नाहीत. कमी जागा देऊन अपमान करायचा व स्वाभिमानीने आदळआपट करून स्वत:च बाहेर पडावे, असे शिवसेनेचे धोरण दिसत असल्याची संघटनेची तक्रार आहे. शिवसेना नेते रामदास आठवले यांनीही निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा वाटप होईल. ते संघटनेला मान्य नसेल, तर खासदार शेट्टी यांनी महायुतीत राहायचे की नाही, हे ठरवावे असे काल, शुक्रवारीच मुंबईत जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील अस्वस्थताही वाढली आहे.शिवसेना संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शिरोळ व चंदगड या दोनच जागा सोडायला तयार आहे. या दोन जागा संघटनेच्या हक्काच्याच आहेत. त्याबाबत ‘माळावर शंख करायला पाटलांची परवानगी कशाला लागते.’ अशी संघटनेची भूमिका आहे. शेट्टी स्वत: खासदार आहेत व लोकसभेला किमान दहा विधानसभा मतदारसंघात त्यांना व सदाभाऊ खोत यांना मताधिक्क्य मिळाले आहे. लढाऊ कार्यकर्त्यांची फौज हे संघटनेचे बलस्थान आहे. त्यामुळे राज्यातील चार-पाच जागा मिळणार असतील तर त्यापेक्षा स्वतंत्र लढलेले बरे, असा संघटनेचा पवित्रा आहे. त्यादृष्टीने शेट्टी यांनी चाचपणीही सुरू केली आहे. जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढण्याची संघटनेची तयारी आहे. ऊस आंदोलनातील यशामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सहा-सात जिल्ह्यांत प्रत्येक मतदारसंघात संघटनेला मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यांची निवडून येण्याची क्षमता नसली, तरी त्या मतदारसंघात कुणाचा पराभव करायचा हे ठरविण्याइतकी संघटनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेमागून फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास दोन्ही काँग्रेसमधील नाराजांचाही पाठिंबा मिळू शकतो, असा संघटनेचा होरा आहे.संघटनेची ‘ताकद’ काय...भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीत या, असे जाहीर निमंत्रण दिल्याने मी त्यामध्ये सहभागी झालो आहे. त्यामुळे महायुतीला आता जर आम्ही नको असेल, तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. जबरदस्तीने कुणाच्या गळ्यात पडण्याचा आमचा स्वभाव नाही. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे, हे आमची ताकद विचारणाऱ्यांनी विसरू नये.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना४राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्रमक हल्ला४शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य४लढाऊ कार्यकर्ते४ऊस आंदोलनातील यश४ग्रामीण प्रश्नांची चांगली जाण४मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीकडे शेट्टी यांच्याशिवाय ग्रामीण भागात प्रभाव असलेला नेता नाही.