शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जागा हडपणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

By admin | Updated: September 5, 2016 00:53 IST

महादेवराव महाडिक : सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर : महापालिकेच्या माध्यमातून शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करणाऱ्यांना ‘गोकुळ’वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी सभेला उपस्थित राहावेच, तेथील आदर्श कारभार पाहून तसा स्वत:च्या संस्थेत करावा, अशी टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली. स्वार्थी प्रवृत्तीने आरोप करून संघ ताब्यात घेऊ पाहणाऱ्या उसन्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ७) होत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्याकडून कारभारावर जोरदार टीका केली. विरोधी गटाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली असून या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’चे नेते महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, महाडिक यांनी पाटील यांचे नाव न घेता सडकून टीका केली. ‘गोकुळ’ देशात अव्वल स्थानावर आहे, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी सरकार डेअरीचे सहकारात रूपांतर केले. अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघाला यशोशिखरावर पोहोचविले. साडेसात लाख उत्पादक संघाशी संलग्न असून यातील दोन लाख भूमीहीन उत्पादक आहेत. आपण व पी. एन. पाटील संघाचे नेतृत्व करत आहे. पारदर्शक कारभारामुळे संघ नावारूपास आला आहे. काही मंडळींनी संघाच्या कारभारावर तक्रारी केल्या आहेत. आम्ही सरकारी यंत्रणेकडे त्याबाबत खुलासा केला आहे; पण हेच लोक महापालिकेत नेतृत्व करत आहेत. त्यांनी शासकीय व गोरगरिबांच्या जागा हडप करण्याचे काम केले असून अशा लोकांना संघावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्यांनी कधी दूध संस्था काढली नाही, जे संघाचे उसने सभासद झाले आहेत, त्यांनी संघावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे महाडिक यांनी सांगितले. राज्यभर दुष्काळ असताना कोल्हापुरात केवळ दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना आधार दिला. स्वार्थी प्रवृत्तीने कारभारावर आरोप करणाऱ्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावेच, संघाचा कारभार पाहावा व तसा आपल्या संस्थेत करण्याचा प्रयत्न करावा, अशी टीकाही त्यांनी केली. ...अन्यथा शेतकरी संघ होईल! एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात शेतकरी संघाचे नाव होते; पण त्या काळातील राजकारण्यांनी आरोप केले आणि मार्केटिंगवर परिणाम झाला. पुढे संघाचे काय झाले, हे जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे ‘गोकुळ’वर आरोप करताना विचार करावा, अन्यथा शेतकरी संघ होईल, असेही महाडिक यांनी सांगितले. २५० सभासदांचा साखर कारखाना सहकारी कसा? आरोप करणाऱ्यांच्या संस्थांचे काम कसे चालले आहे, हे सांगण्याची गरज नाही आणि मी ते त्यावर बोलणारही नाही; पण केवळ २५० सभासद असणारा साखर कारखाना सहकारी कसा? असा सवालही त्यांनी केला.