शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : विद्यार्थ्यांना फटका, शिक्षणासाठीची पायपीट वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:16 IST

सचिन भोसले कोल्हापूर : गेले पंचवीस दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यासह कोल्हापूर विभागातील ...

सचिन भोसलेकोल्हापूर : गेले पंचवीस दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यासह कोल्हापूर विभागातील ४००० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये हळूहळू सुरू होऊ लागली आहेत. त्यात एस.टी. कर्मचाऱ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे शाळा, महाविद्यालय आहे अशा स्थळी जाताना अनेक विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजून जावे लागत आहे. अनेकांनी शाळा, महाविद्यलयाला न जाणेच पसंत केले आहे. अनेकांना तर वर्गात जाता न आल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे. संपाचे दिवस वाढतील तशी वाहतुकीचे साधन नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढू लागली आहे.

५६५ मार्गांवरील वाहतूक ठप्प

प्रवाशांच्या सेवेसाठी हे जरी ब्रीदवाक्य असले तरी एसटी महामंडळाने गाव तेथे एसटी ही संकल्पना राबविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लालपरी आपलीशी झाली आहे. विद्यार्थिनींना १२ वी पर्यंत मोफत प्रवासाची, तर विद्यार्थ्यांना कमी खर्चात तीन महिन्यांचा पास या योजनेद्वारे शिक्षणाच्या गंगेपर्यंत पोहोचते करण्याची व्यवस्था केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत.

पायपीट वाढली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा आता कुठे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळा अथवा महाविद्यालयातही हजेरी सक्तीची होऊ लागली आहे. त्यात एसटीच्या बेमुदत संपामुळे तर विद्यार्थ्यांवर आकाश कोसळले आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामीण भागात एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. दहा ते पंधरा कि.मी. अंतराच्या परिघात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. तेथे पोहोचण्यासाठी चालत जाण्याशिवाय विद्यार्थी, विद्यार्थिनींना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात रोज अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ग्रुप जाताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरापासून अलगद शाळा, महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्याचे सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्याचे साधन लालपरी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून शासनानेच हा संप मिटवावा आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी. - प्रशांत आंबी, राज्य सचिव, एआयएसएफ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संपStudentविद्यार्थी