शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

ST Strike : विद्यार्थ्यांना फटका, शिक्षणासाठीची पायपीट वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:16 IST

सचिन भोसले कोल्हापूर : गेले पंचवीस दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यासह कोल्हापूर विभागातील ...

सचिन भोसलेकोल्हापूर : गेले पंचवीस दिवसांपासून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यासह कोल्हापूर विभागातील ४००० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये हळूहळू सुरू होऊ लागली आहेत. त्यात एस.टी. कर्मचाऱ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे शाळा, महाविद्यालय आहे अशा स्थळी जाताना अनेक विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजून जावे लागत आहे. अनेकांनी शाळा, महाविद्यलयाला न जाणेच पसंत केले आहे. अनेकांना तर वर्गात जाता न आल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे. संपाचे दिवस वाढतील तशी वाहतुकीचे साधन नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चिंता वाढू लागली आहे.

५६५ मार्गांवरील वाहतूक ठप्प

प्रवाशांच्या सेवेसाठी हे जरी ब्रीदवाक्य असले तरी एसटी महामंडळाने गाव तेथे एसटी ही संकल्पना राबविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लालपरी आपलीशी झाली आहे. विद्यार्थिनींना १२ वी पर्यंत मोफत प्रवासाची, तर विद्यार्थ्यांना कमी खर्चात तीन महिन्यांचा पास या योजनेद्वारे शिक्षणाच्या गंगेपर्यंत पोहोचते करण्याची व्यवस्था केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत.

पायपीट वाढली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा आता कुठे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळा अथवा महाविद्यालयातही हजेरी सक्तीची होऊ लागली आहे. त्यात एसटीच्या बेमुदत संपामुळे तर विद्यार्थ्यांवर आकाश कोसळले आहे. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ग्रामीण भागात एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. दहा ते पंधरा कि.मी. अंतराच्या परिघात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. तेथे पोहोचण्यासाठी चालत जाण्याशिवाय विद्यार्थी, विद्यार्थिनींना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात रोज अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ग्रुप जाताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरापासून अलगद शाळा, महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्याचे सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्याचे साधन लालपरी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून शासनानेच हा संप मिटवावा आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी. - प्रशांत आंबी, राज्य सचिव, एआयएसएफ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संपStudentविद्यार्थी