शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

इतिहासाचे नव्याने संशोधन होणे गरजेचे : अरुण भोसले

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

पाश्चिमात्य देशात ऐतिहासिक गोष्टीचे संकलन केले जाते. भारतातही ऐतिहासिक स्थळांचे जतन होणे गरजेचे आहे.

आष्टा : ब्र्रिटिशकालीन भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र व २५ टक्के लोकसंख्येने व्यापलेल्या संस्थानाच्या इतिहासाचे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. मात्र नव्याने उपलब्ध होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन होणे गरजेचे आहे. नव्या संशोधकांनी संधी समजून संस्थानिकांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. अरुण भोसले यांनी केले.आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या इतिहास विभागाच्यावतीने ब्रिटिशकालीन भारताच्या संस्थांनी राज्यातील ऐतिहासिक संसाधने या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. भोसले बोलत होते.डॉ. आर. डी. सावंत म्हणाले, पाश्चिमात्य देशात ऐतिहासिक गोष्टीचे संकलन केले जाते. भारतातही ऐतिहासिक स्थळांचे जतन होणे गरजेचे आहे. माजी प्राचार्य व्ही. डी. माने म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील, शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र होता, तर डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, शाहू महाराज केवळ संस्थानिक नव्हते, तर एक समाज क्रांतिकारक होते.पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. दीपक गायकवाड, कोल्हापूरचे डॉ. अवनीश पाटील, विजापूरचे डॉ. अब्दुलगणी इमरतवाले, प्रा. डॉ. एम. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात देशातील १५० प्राध्यापक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. प्रमोद ओलेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शशिकांत मोहिते यांनी आभार मानले. (वार्ताहर)