शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

महामार्ग बनतोय असुरक्षित

By admin | Updated: July 21, 2014 23:10 IST

रात्री अडवून लूटमारीच्या संख्येत वाढ

काशीळ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत रात्री एकट्या दुखट्या वाटसरूला अडवून लूटमार केली जात आहे. याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या कात्रज घाटापासून ते अगदी किणी वाठार ते अगदी कोल्हापूरपर्यंत हा महामार्ग पसरलेला आहे. यामुळे महामार्गावरील पेठ नाका, कोल्हापूर येथील कावळे नाका, कऱ्हाड, उंब्रज, सातारा जवळील महामार्ग परिसर, शिरवळ, भुर्इंज ठिकाणी मुंबई, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर ठरत आहेत. पहाटे चारपासून ते अगदी मध्यरात्री बारा ते एकपर्यंत वरील ठिकाणी प्रवाशांची तसेच वाहनांची बऱ्यापैकी वर्दळ असते. याचाच गैरफायदा घेत माणूस म्हणून जगणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी महामार्गावर लूटमारीचा धंदा सुरू आहे. महामार्गावरील वाहनांचा तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत पोलीस प्रसाशनापुढे आव्हान उभे केले.महामार्गावर अनेक ठिकाणच्या अपघातामध्ये किड्या-मुंग्यासारखे माणसांचे जीव जात आहेत तर दुसरीकडे लूटमारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने पोलीस प्रशासनाचा महामार्गावरील रात्रगस्तीचा उपक्रम कुठेही उपयोगी पडत नसल्याने पोलिसांची रात्र गस्त म्हणजे काय रे भाऊ ? अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांसह वाहनधारकांवर आली आहे.राष्ट्रीय महामार्ग जणू काही आपलाच या अविर्भावात आजही अनेक ठिकाणी महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल तसेच ढाब्यांवर रात्रीच्या वेळी अगदी रस्त्याच्या कडेला मोठे-मोठे कंटेनर, ट्रक उभे केलेले असतात. अशावेळी रात्रग्रस्त घालणाऱ्या पोलिसांना ही वाहने दिसत नसतील का? आजही रात्री अकरानंतर महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, पुढून बंद तर पाठीमागून चालू असून त्या-त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांना याची माहिती नसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पोलिसांसमोर दरोडेखोरांच्या तपासाचे आव्हानकाही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत अत्याचार झालेल्या मुलीने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची योग्य ती माहिती देत गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाडीचे योग्य वर्णन सांगितल्यानेच पोलिसांंना आरोपीच्या २४ तासांत मुसक्या आवळता आल्या. अशावेळी टोल नाक्यावर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे? अशातच मलकापूर, ता. कऱ्हाड येथील बँकेमध्ये रात्रीवेळी पडलेल्या दरोड्यामध्ये गुन्हेगारांचे दरोडा टाकतानाचे सीसीटीव्हीमध्ये अस्पष्ट चित्रीकरण झाले असल्याने दरोडेखोरांचा तपास लावण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे आहे. विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत असून निव्वळ शोपीस बनत आहेत.