शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील सर्वाधिक पाऊस कोल्हापूरच्या वाकी गावात; विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:00 IST

१०,८०६ मिलिमीटरची नोंद; आंबोलीत ८५७५, तर जोर येथे ८१४४ मिलिमीटर पाऊस

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला आहे. १ जूनपासून आतापर्यंत तेथे १०,८०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ८,५७५, सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज (ता. पाटण) येथे ८,१३३ मिलिमीटर आणि जोर (वाई) येथे ८,१४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी हा ३५० किमीचा भाग सह्याद्री पर्वतरांगांचा आहे. या पर्वतरांगांमध्ये यंदा अभूतपूर्व पाऊस झाल्याने पावसाच्या नोंदींचे तीनही जिल्ह्यांत नवनवे विक्रम झाले आहेत.

वाकी देशात तिसरेदेशातील सर्वाधिक पावसाची नोंद मेघालयातील मॉसिनराम येथील आहे. तेथे वर्षाला सरासरी ११,८७१ मिलिमीटर पाऊस पडतो. त्याखालोखाल चेरापुंजी येथे ११,७७७ मिलिमीटर पाऊस पडतो. वाकी गावात आजअखेर १०,८०६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने नोंदविली आहे.

जलविज्ञान प्रकल्पांतर्गत राज्यभर बसविलेल्या पर्जन्यमापकाद्वारे दर पंधरा मिनिटाला पडणाऱ्या पावसाची नोंद पुण्यातील नियंत्रण कक्षात होते. त्यामुळे ताजी नोंद मिळण्यास मदत होते. या नोंदीनुसार पावसाचे हे आकडे आहेत.कोल्हापूर, विदर्भात पूरस्थिती : वैनगंगा, कृष्णा, पंचगंगा धोक्याच्या पातळीवरपश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला तरी वैनगंगा, कृष्णा,कोयना, पंचगंगा नद्या धोक्याच्या पातळीवर असल्याने पूरस्थिती कायम आहे. नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे. आणखी तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली तरी पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने नदी काठच्या गावांची अस्वस्थता कायम आहे. पंचगंगेची पातळी ३९.१० फुटांवर तब्बल कायम असून, ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यात ३३५.५७ मिलिमीटर पाऊस झाला. सांगलीत कृष्णा नदीपातळी ३३ फुटांवर गेली आहे. सोमवारी कोयना धरणातून ४५ हजार क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.दहा गावांना पुराचा वेढापूर्व विदर्भात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील नदीकाठालगतच्या दहा गावांमध्ये पाणी शिरले. तर नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तिरोडा-धापेवाडा, तिरोडा-परसवाडा, डांर्गोली गोंदिया या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.भंडारा जिल्ह्णातील चांदोरी-शिगोंरी मार्ग, पवनी-कोदुर्ली मार्ग यासह बावनथडी नदीला पूर आल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याशी संपर्क मार्ग (रस्ता) बंद आहे.

पावसाचा अंदाज१० सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बºयाच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ११ व १२ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बºयाच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस