शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरे हसनू... मंगळवार-बुधवार मी जाणार नाही बघ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:28 IST

‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत.

ठळक मुद्देसकिनाबी मुश्रीफ यांचा शब्द खरा : आईच्या निधनानंतर गहिवरले हसन मुश्रीफकौटुंबिक, राजकीय जीवनातील आधार हरपला

कोल्हापूर : ‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत. शुक्रवारी त्यांनी हा शब्द खरा करून दाखविला व हसन मुश्रीफ जवळ असतानाच, वयाच्या ९२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

आईच्या निधनानंतर मुश्रीफ त्यांच्या आठवणींनी गहिवरून गेले. तसे मुश्रीफ हे कागलमधील सधन शेतकरी कुटुंब; पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मुश्रीफ यांचे वडील हे मराठमोळे व्यक्तिमत्त्व. फेटा बांधलेला त्यांचा फोटो आजही त्यांच्या घरी पाहायला मिळाला. साऱ्या गल्लीचे ते ‘बापूजी’ होते. कागलचे ते पहिले उपनगराध्यक्ष.

सुमारे ५० वर्षांपूर्वी स्वत:ची मोटारकार दिमतीला बाळगणारे हे कुटुंब. हसन मुश्रीफ वीस-बावीस वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्याला आज ४६ वर्षे झाली; परंतु वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने हसन, शमशुद्दीन व अन्वर हे भाऊ व तीन बहिणी यांचा सांभाळ केला, त्यांचे आयुष्य घडविले. त्या करारी बाण्याच्या होत्या. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांना चांगली स्मृती होती. त्या आयुष्य अत्यंत शिस्तबद्धपणे जगल्या. मुश्रीफ सांगत होते की, त्यांनी कधीही औषधाची गोळी चुकविली नाही. एखादी गोळी डॉक्टरांच्या पुडीत जास्त आली तरी त्या ‘ही माझी गोळी नव्हे,’ म्हणून आठवण करून द्यायच्या.

गैबी चौकातील जुन्या घरात त्या राहत होत्या. मागील बाजूस हसन मुश्रीफ राहायचे. अनेक वर्षे ते मंत्री राहिल्याने मंगळवार-बुधवार ते हमखास मुंबईला असतात; त्यामुळे ‘तू नसताना मी कधी मरणार नाही बघ,’ असे त्या हसत-हसत म्हणायच्या. शुक्रवारी त्यांच्या मृत्यूनंतर ही आठवण सांगताना मुश्रीफ यांचेही डोळे भरून आले. जुन्या घरात जिथे त्यांची बेडरूम आहे, तेथूनच मुश्रीफ यांच्या बंगल्याकडे रस्ता जातो. त्यामुळे ज्या दिवशी मोटारसायकलींची वर्दळ कमी असेल, त्या दिवशी ‘आज हसनू घरात नाही,’ असा त्यांचा ठोकताळा असे. मुश्रीफ यांना राजकीय व कौटुंबिक जीवनातही आईचा खूप मोठा आधार होता. घरातून बाहेर पडल्यानंतर पाच मिनिटे आईजवळ बसल्याशिवाय गाडीत बसायचे नाही, हा शिरस्ता त्यांच्याकडून कधीच चुकला नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी ते उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांचा आशीर्वाद घेत. ‘तू निवडून येतोस’ असा त्यांचा आशीर्वाद असे. त्या प्रचारात किंवा राजकीय गोष्टींत फारशा नसायच्या; परंतु गल्लीतील सर्वांना घेऊन त्या मतदानाला मात्र आवर्जून जात असत. सत्ता, पद असेल-नसेल; परंतु तू लोकसेवेला कधी अंतर देऊ नको, असे त्यांचे सांगणे असे.आनंदाचा घडा रिता...तिन्ही भावांपैकी हसन मुश्रीफ यांचा स्वभाव, शारीरिक ठेवण सारे कसे आईसारखे. त्यामुळे ‘मी आईच्या वळणावर गेलोय,’ असे ते अभिमानाने सांगत. मुलाने वडिलांचे नाव केले, याचाही त्यांच्या आईला आनंद वाटे. त्या साºया आनंदाचा घडा आज रिता झाला... कायमचाच...!!

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ