शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पाण्याच्या शोधात आलेल्या गव्यांचा कळप पडला कालव्यात, एका गव्याच्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 10:54 IST

Biosan Wildlife Kagal Kolhapur : दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात उंदरवाडी-सरवडे दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या दहा ते बारा गव्यांचा कळप पडल्याची घटना उंदरवाडी (ता.कागल) गावच्या हद्दीत आज सकाळी (गुरुवार दि.२२) घडली. यातील एका गव्याच्या मृत्यू झाला.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात आलेल्या गव्यांचा कळप पडला कालव्यात, एका गव्याच्या मृत्यू

रमेश वारकेबोरवडे/कागल : दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात उंदरवाडी-सरवडे दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या दहा ते बारा गव्यांचा कळप पडल्याची घटना उंदरवाडी (ता.कागल) गावच्या हद्दीत आज सकाळी (गुरुवार दि.२२) घडली. यातील एका गव्याच्या मृत्यू झाला.

सामाजिक कार्यकर्त एन. के.जाधव व अन्य कांहीनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कालव्यात पडलेले इतर गवे सुरक्षेतपणे बाहेर पडले.  रंगराव कुदळे व उंदरवाडीच्या इतर तरुणांनी वाहत आलेल्या मृत गव्याला कालव्याच्या काठाला आणले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृत गव्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.

दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले असून उंदरवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा गव्यांचा कळप कालव्यात पडून तो पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत असलेला एन. के. जाधव यांना दिसला. हे गवे सरवडे येथील शेताजवळील कालव्यात पडल्याचे त्यांनी सांगितले.या गव्यांना वाचविण्यासाठी जाधव यांनी त्यांना हाकलत उंदरवाडी कालव्याच्या लाकडी पुलाजवळ असणाऱ्या कच्च्या भागापर्यंत आणले.तेथून हे गवे बाहेर पडले आणि उंदरवाडीच्या जंगल भागात गेले.

या कळपाबरोबर आलेला एक गवा वाहत्या पाण्यात मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कालव्याशेजारी असणाऱ्या रंगराव कुदळे, भूषण पाटील, संभाजी पाटील, अनिकेत कुदळे व इतर लोकांनी या मृत गव्याला वाहत्या पाण्यातून बाहेर काढत काठावर आणले. सरपंच भारती पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देवून याची कल्पना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

या वर्षीच्या दोन जानेवारीला याच ठिकाणी सात गव्यांचा कळप कालव्यात पडला होता. मोठ्या प्रयत्नामुळे हा कळप  सुरक्षितपणे बाहेर पडला होता. पण आज चक्क दहा ते बारा गव्यांचा कळप कालव्यात पडून त्यातील एका गव्याचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना दुःखदायक असून वनविभाग व पाटबंधारे विभागाने एकमेकाशी चर्चा करुन वन्यप्राण्यांना बाहेर कसे पडता येईल, यावर कायमस्वरुपी उपाय योजना व्हावी. जेणेकरुन गव्यांना आपला जीव वाचवता येईल.

 - एस.के.पाटील, विठ्ठल पाटील,उंदरवाडी (ता.कागल).

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर