शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

तीन गतिमंद मुलांना जगविण्यासाठी ‘तिची’ धडपड

By admin | Updated: October 15, 2015 00:44 IST

सावर्डेच्या ‘माउली’चा संघर्ष : गेल्या ४० वर्षांपासून अहोरात्र परिस्थितीशी झुंज

रमेश वारके --बोरवडे---जीवन जगताना आलेल्या यातना सहन करून आपल्या मुलांना सुखी जीवन देण्याची इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांसाठी ते झटत असतात. इतके कष्ट करूनही नशिबी दुर्देवच आले, तर दोष कुणाला देणार? कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द येथील एका अशिक्षित ‘माउली’ची आपल्या तीन गतिमंद मुलांना जगविण्यासाठी आपल्या परिस्थितीशी झुंज गेली ४० वर्षे अहोरात्र सुरू आहे. अरुण, संगीता, किरण अशी मुलांची नावे आहेत. रखमाबार्इंना पहिला मुलगा अरुण झाला. काही वर्षे गेल्यावर त्याला कापरे भरणे, फिट येणे, अंग थरथरणे याबरोबरच बोलतानाही अरुणला त्रास होऊ लागला. त्यानंतर जन्मलेल्या किरणची अवस्थाही अरुणसारखीचे झाली. मोलमजुरी व तुटपुंज्या शेतीत हाडाची काडे करीत पतीच्या मदतीने रखमाबाईने आज ना उद्या सुधारणा होईल, या आशेवर मुलांना जगविले; परंतु मुलांच्या वाढत्या आजाराच्या काळजीने पती पांडुरंगने सात वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. या माउलीला आज तिन्ही मुलांना सांभाळताना कसरत करावी लागत आहे. मुलगी संगीता घरीच असते; परंतु ही दोन्ही मुले दिवसभर कुठेही भटकत असतात. धडपडत चालताना पडतात. त्यांना शोधून त्यांची सुश्रुशा करावी लागते. कामावार असताना मधल्या सुटीत त्यांना शोधून आणून जेवू घालावे लागते. मुलांसाठीच तिची धडपडआपली मुले व आपण एवढेच तिचे जग आहे. हसू आणि आसू नशीबाला देऊन ही माऊली २४ तास मुलांसाठी झगडत आहे. आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे काय होईल, याची चिंता रखमाबाईला सध्या पडली आहे.