शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

तिची उदंड लेकरे - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:27 AM

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले. ‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या ...

एकीने तर त्या तांदुळाची चकलीची भाजणी करून विकली. हरभऱ्याचे फुटाणे फोडून ते विकले.

‘मोदींना फोनवरून हे सगळं कळवूया. फुकट्या थाळ्यासुद्धा बंद व्हायला हव्यात. लोकांना तुम्ही आळशी बनवताय. त्यांना स्वस्त द्या, फुकट नको. श्रम केल्यानंतरच अन्न पचतं नि अन्नाची किंमत कळते.’

हा उपाय सर्वांना पटला; पण तो लगेच होणारा नव्हता. ‘आपले राणेसाहेब आता दिल्लीत गेल्यामुळे हा निरोप मोदींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली.’ वाडेकर म्हणाले. आपली समस्या काही पुरुषमंडळींना तरी समजली, ह्याचं जमलेल्या स्त्रियांना समाधान झालं. अन्न उरू नये म्हणून प्रत्येक गृहिणीने आपल्या पातळीवर उपाय शोधावा असं ठरलं.

पुरुष आपापसात बोलत होते. ‘देशात, महापूर, नद्याजोड प्रकल्प असे केव्हढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत नि ह्या बायकांचा किती क्षुल्लक प्रॉब्लेम, नि केव्हढी ओरड. अन्न कमी शिजवा म्हणावं, आम्हाला नाही उरलं तर आम्ही बाहेर जाऊ. तेव्हढाच बदल. होय की नाही इनामदार?’

आणि कॉलनीतल्या काही वहिन्यांपर्यंत एक आनंदाची वार्ता पोहचली. काय? तर म्हणे ‘सुशीला निलाखे नावाच्या एक बाई आहेत. त्या पलीकडच्या गल्लीत राहातात. त्यांचं कुटुंब मोठं आहे. त्या तुमच्या घरातलं उरलेलं घेऊन जातील. त्या आपले डबे आणतील. त्यांचा मोबाईल नं. = = = = हा आहे. त्यांना कॉल करून बोलवा.’

हा मेसेज सगळ्या वहिन्यांकडे आला. सगळ्यांना खूप आनंद झाला. सुशीला निलाखेना कॉलवर कॉल येऊ लागले. त्या उरलंसुरलं नेऊ लागल्या. एके दिवशी सुलभाताईंकडे नातीचा वाढदिवस होता. बरीच उराऊर झाली होती. गुलाबजामसारखे टिकणारे जिन्नस त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. पण मसालेभात, कोशिंबिरी, बटाट्याची भाजी बरीच उरली होती. त्यानी सुशीला निलाखेना कळवलं, उरलेलं घेऊन मीच येते. त्या स्कूटरवरून खाली उतरल्या. सुशीलाबाई तिथे फेमस होत्या. त्यामुळे घर सापडायला वेळ लागला नाही. ती एक मोठी झोपडपट्टी होती. सुशीलाबाईंबरोबर त्यांचा नवरा काम करीत होता. फाटक्या कपड्यातली, केस न विंचरलेली, शेंबडी, काळी सावळी साताठ मुलं रांगेत बसली होती. साधारण पाच ते दहा वयाची असतील. सुशीलाबाई पत्रावळीवर डब्यातलं अन्न वाढत होत्या. नवरा एकेक पत्रावळ मुलांच्या समोर ठेवत होता. मुलं आशाळभूतपणे त्या पदार्थांकडे बघत होती. सुलभाताईंनी आपण आणलेल्या अन्नाचे डबे सुशीलाबाईंना दिले. मुलं बकबका जेवू लागली होती. ‘बगा, किती भुकेजली हायीत पोरं. कोनाचे आयबा न्हाईत. कोनाचे रानात कामाला जात्यात.. ह्यांना हिथ सोडून. तुमच्या कडून आनलेले सगळे पदार्थ मी गरम करते. आमटी, कढी उकळते. नि ह्यांना वाढते’. मुलं उठली त्यांच्या पत्रावळी सुशीलाबाईच्या नवऱ्याने घट्टमुट्ट गुडाळल्या नि झाडांच्या मुळात टाकल्या. मग दहा-बारा कुत्री आली.’ तुमच्याकडून आलेलं अगदी शिळं, पोरांनी टाकलेलं खरकटं ही कुत्री खातात. ही भटकी म्हणून ह्यांना कोनी घालत न्हाईत. त्यांचं पोट इथे भरतं.’ सुशीलाबाईचा नवरा म्हणाला.

सुलभाताई तो सगळा प्रकार बघतच राहिल्या. ‘निलाखे बाई, तुम्ही फार चांगलं काम करता आहात.

रॉबिन हूड नावाची एक संस्था हेच काम करते. हॉटेल मधलं किंवा विवाह कार्यालयातलं उरलेलं अन्न ते झोपडपट्ट्यांचा शोध घेऊन तिथल्या भुकेलेल्यांना वाढतात. पण मला असं सांगा, ह्या मुलांच्या घरी सरकारी धान्य मिळत नाही?

‘ही भटकी आहेत ना ह्यांच्याकडे रेशनकार्ड न्हाई.’

‘ती तुम्ही कोणती संस्था म्हणता ती आम्हाला ठाऊक न्हाई. आम्ही आमच्या मनाने हे सुरू केलं.

आम्हाला सोताची पोरं न्हाईत. हीच आमची लेकरं.’

‘उदंड लेकरं आहेत की तुम्हाला. आम्हाला सांगा काही मदत हवी तर’, असं म्हणून सुलभाताई घरी आल्या. आपल्या वर्तुळाबाहेर येऊन आपल्यालाही असं काही करता येईल का हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला.