शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

मदतगारांनाच ‘संधी’ गद्दारांचा ‘विचार’ करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:08 IST

नंदिनी बाभूळकर : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट

नेसरी/गडहिंग्लज : शेतकऱ्यांचे हित व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सन्मान हेच सूत्र आणि स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या विचारानेच गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत भूमिका घेतली जाईल. विधानसभेला ज्यांनी मदत केली त्यांनाच संधी आणि गद्दारी केलेल्यांचा ‘विचार’ केला जाईल, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.कानडेवाडी येथे गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बी. एन. पाटील होते.बाभूळकर म्हणाल्या, ब्रीसक् कंपनी कारखान्याचा आर्थिक व्यवहार पाहील. मात्र, शेतकऱ्याचं हित व सभासदांची मालकी जपण्यासाठी नि:स्वार्थी आणि हक्काचं संचालक मंडळ हवं. गाव तिथे राष्ट्रवादी आहे. त्यामुळेच या निवडणुकीतही नक्कीच यश मिळेल.संध्यादेवी म्हणाल्या, गडहिंग्लज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच भूमिका घेतली जाईल. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, कारखान्यातील पहिल्या सत्तांतरापासून प्रत्येक निवडणुकीत स्व. कुपेकरांच्या शब्दावरच सभासदांनी विश्वास टाकला. मात्र, ज्यांना नेतृत्वाची संधी दिली, तेच उलटे गेले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच संधी मिळते, याचा विसर पडू नये.जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी म्हणाले, अवर्षणग्रस्त भाग असूनही पूर्वभागातील ऊस वेळेत जात नाही. एका ट्रॅक्टरच्या बाँडसाठी मुश्रीफ यांच्याकडे चारवेळा गेलो तरी काम झाले नाही. यावेळी जयसिंग चव्हाण , सतीश पाटील, माजी सभापती अमर चव्हाण यांनी मनोग व्यक्त केले. यावेळी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार केल्याबद्दल नंदाताई बाभूळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नारायण चव्हाण, अनिल पाटील, बी. वाय. पाटील, गणपतराव थोरात, रवींद्र आसवले, तुकाराम वार्इंगडे, जितेंद्र शिंदे, मंजूषा कदम यांचीही भाषणे झाली. बैठकीस उपसभापती तानाजी कांबळे, महाबळेश्वर चौगुले, मुन्ना नाईकवाडे, जनार्दन बामणे उपस्थित होते. संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढणारआगामी निवडणूक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यंदाच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी केली आहे. मात्र, ७० टक्के सभासद चंदगड मतदारसंघात असल्याचा वारंवार उल्लेख करून ही निवडणूक संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल, असे बहुतेक वक्त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.