शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

मदतगारांनाच ‘संधी’ गद्दारांचा ‘विचार’ करू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:08 IST

नंदिनी बाभूळकर : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट

नेसरी/गडहिंग्लज : शेतकऱ्यांचे हित व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सन्मान हेच सूत्र आणि स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या विचारानेच गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत भूमिका घेतली जाईल. विधानसभेला ज्यांनी मदत केली त्यांनाच संधी आणि गद्दारी केलेल्यांचा ‘विचार’ केला जाईल, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.कानडेवाडी येथे गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बी. एन. पाटील होते.बाभूळकर म्हणाल्या, ब्रीसक् कंपनी कारखान्याचा आर्थिक व्यवहार पाहील. मात्र, शेतकऱ्याचं हित व सभासदांची मालकी जपण्यासाठी नि:स्वार्थी आणि हक्काचं संचालक मंडळ हवं. गाव तिथे राष्ट्रवादी आहे. त्यामुळेच या निवडणुकीतही नक्कीच यश मिळेल.संध्यादेवी म्हणाल्या, गडहिंग्लज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच भूमिका घेतली जाईल. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, कारखान्यातील पहिल्या सत्तांतरापासून प्रत्येक निवडणुकीत स्व. कुपेकरांच्या शब्दावरच सभासदांनी विश्वास टाकला. मात्र, ज्यांना नेतृत्वाची संधी दिली, तेच उलटे गेले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच संधी मिळते, याचा विसर पडू नये.जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी म्हणाले, अवर्षणग्रस्त भाग असूनही पूर्वभागातील ऊस वेळेत जात नाही. एका ट्रॅक्टरच्या बाँडसाठी मुश्रीफ यांच्याकडे चारवेळा गेलो तरी काम झाले नाही. यावेळी जयसिंग चव्हाण , सतीश पाटील, माजी सभापती अमर चव्हाण यांनी मनोग व्यक्त केले. यावेळी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार केल्याबद्दल नंदाताई बाभूळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नारायण चव्हाण, अनिल पाटील, बी. वाय. पाटील, गणपतराव थोरात, रवींद्र आसवले, तुकाराम वार्इंगडे, जितेंद्र शिंदे, मंजूषा कदम यांचीही भाषणे झाली. बैठकीस उपसभापती तानाजी कांबळे, महाबळेश्वर चौगुले, मुन्ना नाईकवाडे, जनार्दन बामणे उपस्थित होते. संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढणारआगामी निवडणूक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यंदाच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी केली आहे. मात्र, ७० टक्के सभासद चंदगड मतदारसंघात असल्याचा वारंवार उल्लेख करून ही निवडणूक संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल, असे बहुतेक वक्त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.