यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुरामुळे बाधित झालेले कुटुंब पडझड झालेल्या घरामध्ये राहत नसल्याची खात्री ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनाम्याद्वारे केल्यानंतरच पूरग्रस्तास घरबांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाईल, असा अजब आदेश महसूल विभागाने गुरुवारी काढला. त्यामुळे डागडुजी करून घरात कसेबसे राहत असलेल्यांना मदत दिली जाणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील घरांसाठी हा जीआर काढला आहे. किमान १५ टक्के पडझड झालेली कच्ची, पक्की घरे (झोपडी वगळून) बांधण्यास आर्थिक मदत ही विविध घरकुल योजना आणि आपत्ती प्रतिसाद निधीतून दिली जाणार आहे.बाधित कुटुंबाची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेने केलेली नसेल अशा कुटुंबाला तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करून घेण्यास शहरी भागात ३६ हजार रुपये आणि ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी मदत म्हणून देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित कुटुंब पडझड झालेल्या घरात राहत नाही याची खात्री करून घेतल्यानंतरच ही रक्कम दिली जाणार आहे.