शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पडझड झालेल्या घरात राहत नसाल तरच मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 06:16 IST

पूरग्रस्तांच्या मदतीचा अजब ‘जीआर’

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुरामुळे बाधित झालेले कुटुंब पडझड झालेल्या घरामध्ये राहत नसल्याची खात्री ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनाम्याद्वारे केल्यानंतरच पूरग्रस्तास घरबांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाईल, असा अजब आदेश महसूल विभागाने गुरुवारी काढला. त्यामुळे डागडुजी करून घरात कसेबसे राहत असलेल्यांना मदत दिली जाणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील घरांसाठी हा जीआर काढला आहे. किमान १५ टक्के पडझड झालेली कच्ची, पक्की घरे (झोपडी वगळून) बांधण्यास आर्थिक मदत ही विविध घरकुल योजना आणि आपत्ती प्रतिसाद निधीतून दिली जाणार आहे.बाधित कुटुंबाची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेने केलेली नसेल अशा कुटुंबाला तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करून घेण्यास शहरी भागात ३६ हजार रुपये आणि ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी मदत म्हणून देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित कुटुंब पडझड झालेल्या घरात राहत नाही याची खात्री करून घेतल्यानंतरच ही रक्कम दिली जाणार आहे.

शेतीच्या नुकसानीसाठी एक हेक्टरपर्यंतचेच पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. पीककर्ज नसलेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे किमान ५० टक्के नुकसान झालेले असेल तर त्या पिकासाठी/क्षेत्रासाठी देय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. ३३ ते ५० टक्के दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जाणार आहे.

हा जीआर त्यांच्या हिताचाच - चंद्रकांत पाटीलयाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनाला पूरग्रस्तांच्या जीवाची काळजी आहे. त्यांनी पडक्या घरात राहू नये, ही भूमिका त्यामागे आहे. आम्ही त्यांना पर्यायी घराच्या भाड्यासाठी एकरकमी रक्कम देणार आहोत व त्यांची घरे उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत देणार आहोत. त्यामुळे हा जीआर त्यांच्या हिताचाच आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर