शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

राज्यात सव्वा लाख वारसदारांचे कोरोना अनुदानासाठी हेलपाटे; तेरा हजार जणांनाच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 07:34 IST

राज्य शासनाकडे निधीच नसल्याने वितरण ठप्प

- इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाने मृत्यू झालेल्यांंचे राज्यातील १ लाख ३३ हजार ७३० जणांचे वारस ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी हेलपाटे मारत आहेत. गेल्या चार महिन्यांत फक्त १३ हजार १५४ लोकांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग झाली असून, हे प्रमाण फक्त ८.९५ टक्के इतके आहे. राज्य शासनाकडे निधीच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून वारसांच्या खात्यावर रक्कमच वर्ग झालेली नाही.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती. त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्य सरकारने करावी, असे सांगितले होते. डिसेंबरपासून निधी वितरणाला सुरुवात झाली. राज्यातून आजवर कोरोनाने मृत्यू झालेल्या २ लाख ४५ हजार ५५७ लोकांच्या वारसांचे अर्ज आले आहेत. तेव्हापासून आजतागायत फक्त १३ हजार ५४ वारसांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एकाही वारसाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे आपल्या जिवाभावाची व्यक्ती गमावून बसलेल्या कुटुंबांना आता निधीसाठीदेखील तिष्ठत राहावे लागत आहे.  

कार्यालयात हेलपाटे...

कोरोनामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्यासाठी मोलाची असणार आहे. परंतु, हा निधी कधी मिळतो, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रोज नागरिक हेलपाटे मारत आहेत. परंतु, रक्कम थेट राज्य शासनाकडून वर्ग केली जात असल्याने अधिकाऱ्यांनाही काय उत्तर द्यावे, हेच कळत नाही. काही दिवसांत रक्कम मिळेल, असे सांगून दिलासा दिला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार