शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा, जोरदार वादळ वाऱ्याने झाडे उन्मळून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:16 IST

Cyclon Rain Kolhapur : तौउते चक्रीवादळच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरात अक्षरशः धिंगाणा घातला. जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वांनाच सक्तीने घरातच बंदिस्त केले. दुपारनंतर संततधार पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाचा धिंगाणा, जोरदार वादळ वाऱ्याने झाडे उन्मळून पडलीदुपारनंतर पावसाने झोडपले, उन्हाळी पिकांची दाणादाण

कोल्हापूर : तौउते चक्रीवादळच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरात अक्षरशः धिंगाणा घातला. जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वांनाच सक्तीने घरातच बंदिस्त केले. दुपारनंतर संततधार पावसाने झोडपून काढले.सकाळपासून जोरदार वारे आणि किरकोळ सरींनी आगमन केलेल्या पावसाने दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला. तशी या वादळी पावसाने शनिवारी संध्याकाळीच धडक दिली होती. सातनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी पहाटेपासूनच जोर धरला होता. जोरदार वारेही वाहत असल्याने प्रचंड थंडीही जाणवत होती. अधून-मधून एखादं दुसरी सरदेखील येत होती. पावसाळी वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शनदेखील झाले नाही. दुपारी दोननंतर पावसाचा जोर वाढला. धो धो कोसळणाऱ्या सरीमुळे पावसाळ्याआधीच मान्सून पावसाची अनुभूती कोल्हापूरकरांनी घेतली.पोलिसांचे हालकडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यांवर लावण्यात आला आहे. जोरदार वारे व पावसामुळे त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.पिकांचे नुकसानवादळी पावसाने काढणीस आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले. भात, नाचणी, भुईमूग, मका, कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली ऊस ही जमिनी वर लोळला आहे.मशागती खोळंबल्यारोहिणी आणि मृगाचा पेरा साधण्यासाठी मशागत करण्यासाठी म्हणून शेतकरी शिवारात दिवस रात्र राबत आहे. गेले महिनाभर अधून मधून पडणाऱ्या वादळी पावसामुळे मशागतीची कामे ही सोपी झाली होती; पण आता जोरदार पावसामुळे शिवारात चिखल झाला आहे. मशागतीसाठी साधने आता चालणे शक्य नाही. दोन दिवसांत पाऊस थांबला तरच खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत.पेरणीची तयारी सुरूया वादळामुळे हा दोन- तीन दिवसांचा अपवाद वगळता हा संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. त्यामुळे ज्यांची मशागतीची कामे झाली आहेत, त्यांनी भाताची धुळवाफ पेरणीची तयारी सुरू केली आहे. पाऊस थांबला की आहे, त्या घातीवर पेरणी उरकण्याची जोडणी घालण्यात आली आहे. सोयाबीन व भुईमूग पेरणीलाही आता वेग येणार आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊसkolhapurकोल्हापूर