शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूरात पावसाचा जोर: नदी काठच्या गावांची स्थलांतराची तयारी

By राजाराम लोंढे | Updated: July 21, 2024 17:19 IST

धाकधूक वाढली; पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळ पासून धुवांधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. पंचगंगा नदी ३७ फुटाच्या वरुन वाहू लागल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा वाढणारा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थलांतराची तयारी सुरु केली आहे.

रविवार सकाळ पासून जिल्ह्यात संततधार सुरु आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरशा ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. एक सारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले असून राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे. काल दिवसभारत ७३ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणात ८० टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे, म्हणजेच ६६३१. २० द .ल.घ.मी पाणी साठा असून ३३७.८० फूट पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरणात जून महिन्यापासून ते २१ जुलै पर्यंत २३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज राधानगरी धरणातील विज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेस विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. याशिवाय, वारणा ७२ टक्के भरले आहे.

म्हणूनच पुराचे पाण्याला संथ गती‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ ही धरणे भरलेली नाहीत. ‘राधानगरी’ व ‘वारणा’तून वीज निर्मितीसाठीच विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी संथ गतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात पंचगंगेची पातळी अवघ्या दोन इंचाने वाढली आहे.

कोल्हापूर शहरातील रस्ते ओसधुवांधार पाऊस त्या रविवारची सुट्टीमुळे कोल्हापूर शहरातील रस्ते अक्षरशा ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. महत्वाचे काम असेल तेच नागरिक रस्त्यावर दिसत होते.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर