शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:06 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.

ठळक मुद्दे‘पंचगंगे’ची पातळी २२ फुटांवर बारा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १६१.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून कडवी, कासारी, कोदे या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस कोदे धरणक्षेत्रात ११४ मिलिमीटर झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.राधानगरी धरणाचे मंगळवारी दुपारी क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, सांडव्यासह एकूण विसर्ग प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. तुळशीतून ७५६, वारणातून १५७१, दूधगंगेतून ५२५ घनफूट असा विसर्ग सुरू आहे.पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, तब्बल बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.गणेशोत्सवाच्या धामधुमीतच जोरदार पाऊस कोसळत असल्याने तरुण मंडळांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात घरगुती गणेश विसर्जनाच्या अगोदर दोन दिवस सजीव देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पावसामुळे मंडळांची गोची झाली आहे.शेतीला पोषक पाऊस

भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची परिपक्वतेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या काळात पिकांना पाण्याची गरज असते. त्यामुळे हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून, मध्यंतरी दोन आठवडे दिलेली उघडीप व त्यानंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने ऊसपिकांची जोमात वाढ होण्यास मदत होणार आहे.सरासरीच्या निम्मा पाऊसजिल्ह्यात पडणाºया पावसाची वार्षिक सरासरी १७७२.३९ मिलिमीटर आहे. आतापर्यंत सरासरी ९०७.६० (५१.२१ टक्के) मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅगस्ट महिन्याच्या सरासरीच्या केवळ २७ टक्के पाऊस झाला आहे.

धरणातील पाण्याचा विसर्गप्रतिसेकंद घनफूटमध्ये असा-राधानगरी- ३,६२८तुळशी - ७५६वारणा - १५७१दूधगंगा - ५२५कासारी - १३५२कडवी - १८६कुंभी - १२५०घटप्रभा - १६२५