शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:06 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.

ठळक मुद्दे‘पंचगंगे’ची पातळी २२ फुटांवर बारा बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १६१.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून कडवी, कासारी, कोदे या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस कोदे धरणक्षेत्रात ११४ मिलिमीटर झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.राधानगरी धरणाचे मंगळवारी दुपारी क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, सांडव्यासह एकूण विसर्ग प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. तुळशीतून ७५६, वारणातून १५७१, दूधगंगेतून ५२५ घनफूट असा विसर्ग सुरू आहे.पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, तब्बल बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.गणेशोत्सवाच्या धामधुमीतच जोरदार पाऊस कोसळत असल्याने तरुण मंडळांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात घरगुती गणेश विसर्जनाच्या अगोदर दोन दिवस सजीव देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पावसामुळे मंडळांची गोची झाली आहे.शेतीला पोषक पाऊस

भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची परिपक्वतेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या काळात पिकांना पाण्याची गरज असते. त्यामुळे हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून, मध्यंतरी दोन आठवडे दिलेली उघडीप व त्यानंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने ऊसपिकांची जोमात वाढ होण्यास मदत होणार आहे.सरासरीच्या निम्मा पाऊसजिल्ह्यात पडणाºया पावसाची वार्षिक सरासरी १७७२.३९ मिलिमीटर आहे. आतापर्यंत सरासरी ९०७.६० (५१.२१ टक्के) मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅगस्ट महिन्याच्या सरासरीच्या केवळ २७ टक्के पाऊस झाला आहे.

धरणातील पाण्याचा विसर्गप्रतिसेकंद घनफूटमध्ये असा-राधानगरी- ३,६२८तुळशी - ७५६वारणा - १५७१दूधगंगा - ५२५कासारी - १३५२कडवी - १८६कुंभी - १२५०घटप्रभा - १६२५