शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली

By राजाराम लोंढे | Updated: September 27, 2023 19:09 IST

मंगळवार (दि.३ ऑक्टोबर) पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज

कोल्हापूर : परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अक्षरश: झोडपून काढले. अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसाने शहरात सगळीकडे पाणीच पाणी करून सोडले. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कडगाव, शिरोळसह पाच सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.ऐन मान्सूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने तासभर झोडपून काढले. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शिवारात पाणी साचले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शिरोळ, कडगाव, आंबा, हलकर्णी, कसबा नूल या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी पावणेचार वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली. अर्धा-पाऊण तासात सगळीकडे पाणीच पाणी केले.मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात रोज परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. ओढे-नाले ओसंडून वाहत असून, असाच पाऊस आणखी दोन दिवस राहिला तर धरणातून विसर्गही वाढणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यताही आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस