शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:18 IST

Suicide Kolhapur- दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले. करवीर तालुक्यात घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.

ठळक मुद्देप्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना आईबाबांनी तुम्हाला घडविले ते याचसाठी का..

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले.  घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.आईवडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले ते हे दिवस पाहण्यासाठीच का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.मुलगी अतिशय हुशार. दहावीत ९२ टक्के गुण मिळालेले. अत्यंत धाडसी व जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणारी. एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असलेले.

कौटुंबिक स्थिती तशी बेताची; परंतु आईवडिलांनी अत्यंत कष्टातून तिला घडविले. दिसायला सुंदर आहे. चांगले करिअर केलेस तर कुठेही चांगले स्थळ येईल, अशी त्यांची भावना. एसटीतून प्रवासाचा त्रास नको म्हणून आईनेच कोल्हापुरात मामाकडे तिला शिक्षणासाठी ठेवले. अकरावीतही तिने चांगले गुण मिळविले. याच दरम्यान गावात दोन घटना घडल्या. एकाच आठवड्यात दोन प्रेमविवाह झाले. त्याचदरम्यान निपाणीजवळचे एक चांगले स्थळ मुलीला आल्यावर गेल्या रविवारी मुलीचे लग्न ठरवून ठेवले.मुलाची कौटुंबिक स्थिती सधन. वडील सहकारी संस्थेत नोकरीस. मुलगा एकुलता. कुटुंबालाही त्याच्याबद्दल कमालीचा अभिमान. उंचापुरा व भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा.. त्याने लष्करात जावे म्हणून त्याप्रकारचे प्रशिक्षण सुरू असलेले. वडिलांना तर मुलाची केवढी हौस. गेल्याच आठवड्यात शब्द टाकल्यावर वडिलांनी नवी कोरी बुलेट दारात आणून उभी केली.

एवढे जिवापाड प्रेम करणारे आईवडील असूनही त्यानेही त्याचे प्रेम त्यांच्याजवळ व्यक्तच केले नाही. मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला व दिलेल्या शब्दानुसार दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला विष घेऊन जीवन संपविले. मुलगा आधी गेला व मुलगी त्यानंतर.. परंतु दोघांचाही शेवट एकच.. दोन उमलणारी फुले अकालीच कोमेजून गेली. या मार्गाने तुम्ही जाऊ नका असे त्यांना मायेने जवळ घेऊन सांगणारे कोणच भेटले नसेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भले कुटुंबाचा विरोध होता तर दोघांनाही पळून जाऊन लग्न करण्याचा सोपा पर्याय हाताशी होता. ते जमणार नव्हते तर किमान आईवडील, मित्र, जवळचे नातलग यांच्याकडे प्रेमाची भावना व्यक्त करता आली असती. त्यातून चर्चेतून सहज मार्ग निघू शकला असता; परंतु तसे काहीच न करता एकदम टोकाला जाऊन ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी कष्ट उपसले, तुमच्यावर जिवापाड प्रेम केले, त्यांना आयुष्यभराचे दु:ख देऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने निघून गेलात.. कधीच परत न येण्यासाठी... हा अधिकार तरी मग तुम्हाला कुणी दिला..?

आणखी एक घटना पन्हाळा तालुक्यातील नेबापूर गावची. प्रेम प्रकरणातून विष प्राशन करून नेबापूरच्या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेतीवर फवारणी करणारे विषारी तणनाशक प्राशन करून या युवकाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. वडीलांचे छत्र नव्हते, लहान बहीण आणि आईसोबत तो रहात होता. सेंट्रिंग काम करत घर चालले होते. प्रेमात अपयश आले म्हणून त्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केेले. परंतु बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आता त्या विधवा आईने कोणाकडे पहायचे नवे आव्हान...ही घटना एका गावातील असली, तरी अन्य गावांतील सामाजिक स्थिती याहून वेगळी नाही. कुटुंब व्यवस्थेतील नवे आव्हान म्हणून पालकांनी त्याकडे पाहिले पाहिजे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, दुरावलेले नातेसंबंध, जातीपातीची घट्ट होत चाललेली भावना अशी अनेक कारणे या घटनांच्या मुळाशी आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूर