शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:18 IST

Suicide Kolhapur- दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले. करवीर तालुक्यात घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.

ठळक मुद्देप्रेम व्यक्त न करताच त्यांनी संपविले जीवन; करवीर तालुक्यातील घटना आईबाबांनी तुम्हाला घडविले ते याचसाठी का..

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोघेही एकाच समाजातील.. कुटुंबांचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच.. दोघांचेही आता कुठे जीवन फुलू लागले होते... त्यातून प्रेमाचे धागे जुळले; परंतु त्याबद्दल विश्वासाने स्वत:च्या आईवडिलांजवळ ती भावना व्यक्त न करताच ते आपल्याला लग्न करू देणारच नाहीत असा टोकाचा समज करून दोघांनीही विष प्राशन करून जीवनच संपविले.  घडलेली ही घटना कुणाच्याही मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे.आईवडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले ते हे दिवस पाहण्यासाठीच का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.मुलगी अतिशय हुशार. दहावीत ९२ टक्के गुण मिळालेले. अत्यंत धाडसी व जीवनात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणारी. एक भाऊ व बहीण शिक्षण घेत असलेले.

कौटुंबिक स्थिती तशी बेताची; परंतु आईवडिलांनी अत्यंत कष्टातून तिला घडविले. दिसायला सुंदर आहे. चांगले करिअर केलेस तर कुठेही चांगले स्थळ येईल, अशी त्यांची भावना. एसटीतून प्रवासाचा त्रास नको म्हणून आईनेच कोल्हापुरात मामाकडे तिला शिक्षणासाठी ठेवले. अकरावीतही तिने चांगले गुण मिळविले. याच दरम्यान गावात दोन घटना घडल्या. एकाच आठवड्यात दोन प्रेमविवाह झाले. त्याचदरम्यान निपाणीजवळचे एक चांगले स्थळ मुलीला आल्यावर गेल्या रविवारी मुलीचे लग्न ठरवून ठेवले.मुलाची कौटुंबिक स्थिती सधन. वडील सहकारी संस्थेत नोकरीस. मुलगा एकुलता. कुटुंबालाही त्याच्याबद्दल कमालीचा अभिमान. उंचापुरा व भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा.. त्याने लष्करात जावे म्हणून त्याप्रकारचे प्रशिक्षण सुरू असलेले. वडिलांना तर मुलाची केवढी हौस. गेल्याच आठवड्यात शब्द टाकल्यावर वडिलांनी नवी कोरी बुलेट दारात आणून उभी केली.

एवढे जिवापाड प्रेम करणारे आईवडील असूनही त्यानेही त्याचे प्रेम त्यांच्याजवळ व्यक्तच केले नाही. मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला व दिलेल्या शब्दानुसार दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला विष घेऊन जीवन संपविले. मुलगा आधी गेला व मुलगी त्यानंतर.. परंतु दोघांचाही शेवट एकच.. दोन उमलणारी फुले अकालीच कोमेजून गेली. या मार्गाने तुम्ही जाऊ नका असे त्यांना मायेने जवळ घेऊन सांगणारे कोणच भेटले नसेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भले कुटुंबाचा विरोध होता तर दोघांनाही पळून जाऊन लग्न करण्याचा सोपा पर्याय हाताशी होता. ते जमणार नव्हते तर किमान आईवडील, मित्र, जवळचे नातलग यांच्याकडे प्रेमाची भावना व्यक्त करता आली असती. त्यातून चर्चेतून सहज मार्ग निघू शकला असता; परंतु तसे काहीच न करता एकदम टोकाला जाऊन ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे करण्यासाठी कष्ट उपसले, तुमच्यावर जिवापाड प्रेम केले, त्यांना आयुष्यभराचे दु:ख देऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने निघून गेलात.. कधीच परत न येण्यासाठी... हा अधिकार तरी मग तुम्हाला कुणी दिला..?

आणखी एक घटना पन्हाळा तालुक्यातील नेबापूर गावची. प्रेम प्रकरणातून विष प्राशन करून नेबापूरच्या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेतीवर फवारणी करणारे विषारी तणनाशक प्राशन करून या युवकाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. वडीलांचे छत्र नव्हते, लहान बहीण आणि आईसोबत तो रहात होता. सेंट्रिंग काम करत घर चालले होते. प्रेमात अपयश आले म्हणून त्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केेले. परंतु बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आता त्या विधवा आईने कोणाकडे पहायचे नवे आव्हान...ही घटना एका गावातील असली, तरी अन्य गावांतील सामाजिक स्थिती याहून वेगळी नाही. कुटुंब व्यवस्थेतील नवे आव्हान म्हणून पालकांनी त्याकडे पाहिले पाहिजे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, दुरावलेले नातेसंबंध, जातीपातीची घट्ट होत चाललेली भावना अशी अनेक कारणे या घटनांच्या मुळाशी आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूर