शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्यातूनच धोकादायक वाहतूक : मुरगूड-कापशी रस्त्यावरील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:36 IST

मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी-

ठळक मुद्देलहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण; तलावाच्या सांडव्यावर उड्डाणपुलाची गरज

अनिल पाटील ।मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी-गडहिंग्लज या रस्त्यावरूनच होत आहे. त्यामुळे साधारणत: दीडशे मीटर लांब व दोन फूट खोल पाण्यातूनच कसरत करीत वाहनधारकांना वाहने न्यावी लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेक वाहने या पाण्यातून गेल्याने बंद पडली आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका तर बसला आहे; पण या ठिकाणचा रस्ता शेवाळल्याने लहान-मोठे अपघात दरवर्षी घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे.

१९२०च्या सुमारास पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांतील ग्रामस्थांच्या मागणीवरून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी तलाव बांधण्याचे वचन दिले होते. यातूनच या ऐतिहासिक तलावाची निर्मिती झाली. प्रसिद्ध स्थापत्यकार सर विश्वेश्वरैया यांच्या मार्गदर्शनानुसार या तलावाचीबांधणी करण्यात आली असून, तलावामध्ये ज्या दिशेने पाणी येते त्याच दिशेने तलाव भरल्यानंतरमोठ्या प्रमाणात विसर्ग होतो.त्यामुळे तलावाच्या भिंतीवरअथवा भरावावर दाब येत नाही. हेच विसर्गाचे पाणी अत्यंत वेगाने मुरगूड-कापशी-गडहिंग्लज या रस्त्यावरूनच जाते.

मुरगूड शहरामध्ये कापशी, गडहिंग्लज या भागातून येणाऱ्या-जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. या सर्वांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. यातील काही प्रवासी एस.टी.ने, तर काही मोटारसायकलने प्रवास करतात. जर तलाव भरल्यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असेल, तर या विसर्गाच्या ठिकाणी ये-जा करणे अत्यंत धोक्याचे असते. त्यातच ज्या ठिकाणी पाणी वाहते तो रस्ता अत्यंत निकृष्ट असून, मोठमोठे खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. यातूनच काही मोटारसायकलस्वार धाडसाने गाड्या घालतात. त्यातून अनेक अपघात घडले आहेत. काही वेळा पाण्याचा प्रवाह वाढला तर एसटी वाहतूकसुद्धा बंद केली जाते. पर्यायाने दौलतवाडी, करंजिवणे, हळदवडे, हळदी, बेनिक्रे, आदी गावांतील मुलांना शाळेला दांडी मारावी लागते.

या विसर्गाच्या पलीकडील म्हणजेच दौलतवाडी गावाकडील बाजूस काही वर्षांपूर्वी शासनाने आय.टी.आय.ची भव्यदिव्य इमारत बांधली आहे. या ठिकाणी कागल तालुक्यासह अन्य गावांतून शेकडो विद्यार्थी येतात. या सर्वांना मुरगूडकडून या पाण्यातूनचजावे लागते. या तलावातील पाणीपातळी स्थिर होण्यास साधारणत: एक दीड महिना लागतो. इतके दिवस या रस्त्यावरून अहोरात्र पाणी गेल्याने हा संपूर्ण रस्ता शेवाळला जातो आणि ज्यावेळी रस्त्यावरील पाणी पूर्णपणे बंद होईल,

त्यावेळी मोटारसायकल घसरून या ठिकाणी मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे तलाव भरल्यानंतर साधारणत: दीड-दोन महिने या ठिकाणाहून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. तलाव भरल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा आनंद घेण्यासाठी एक-दोन दिवसांमध्ये शहरवासीय गर्दी करतात. त्यांच्या दृष्टीने उड्डाणपुलाची आवश्यकता नसेलही; पण क्षणिक आनंदापेक्षा एखाद्याचा जीव लाखमोलाचा असतो. त्यामुळे तत्काळ लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.पुलाची मागणीया ठिकाणी दरवर्षी तलाव भरला आणि विसर्ग सुरूझाला की हा प्रश्न समोर येतो. अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या उड्डाणपुलाबाबत मागणी होत आहे. याला अनुसरून पंचायत समितीचे उपसभापती विजय भोसले, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, व्यापारी मित्र मंडळ यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी मागणी केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर