शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

By समीर देशपांडे | Updated: October 7, 2024 17:52 IST

'शरद पवारही आतून तिकडचे'

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ दोन, अडीचशे घराण्यांमध्येच सुरू आहे. त्या पलिकडे सामान्य परंतु नेतृत्व करू शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना सोबत घेवून आम्हांला या घराण्यापलिकडे राजकारण न्यायचे आहे. आघाडी आणि युती'त आलटून, पालटून दोन्हीकडे तीच तीच माणसे दिसतात. त्यामुळेच आम्ही हा तिसरा पर्याय काढला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.साखर हंगामाबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या ऊसाला अजूनही २०० रूपये मिळावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. गेल्यावर्षभरात साखरेचे भाव ३६०० रूपयांपर्यंत राहिले आहेत. मोलॅसिस, इथेनॉल, बगॅसचे दरही वाढले. त्यामुळे माळेगाव, विठ्ठल साखर कारखान्याला जर ३६०० रूपये देता येतात तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या धनदांडग्या साखर कारखानदारांना काय धाड मारली आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 'कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय' १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे असताना बॉयलर पेटले आहेत. त्याआधी कारखाने सुरू झाले तर नियमाप्रमाणे रोज प्रतिटन ५०० रूपयांचा दंड सरकारने वसूल केला पाहिजे. अन्यथा कारखानादार आमचे ऐकत नाही असे सरकारने तरी जाहीर करायला पाहिजे. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आम्ही काय करायचे ते ठरवले आहे. महिनाभर आधी ऊस परिषद घेत आहोत. नाही तरी आम्ही ऊसाचा बुडका तयार ठेवलाच आहे असे ते म्हणाले.'शरद पवारही आतून तिकडचे'हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते आणि ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळ इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण