शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगलेमध्ये शिंदे गट उमेदवार बदलणार का? धैर्यशील मानेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:54 IST

Hatkanangle Lok Sabha Election : शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे .

Hatkanangle Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये उमेदवार यादी जाहीर झाली असून काही जागांसाठी अजूनही बैठका सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, यावर खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. 

Hatkanangle Lok Sabha Election : 'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'; धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल

"शिरसाट यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कुठेही उमेदवार बदलणार असल्याचे संकेत  दिलेले नाहीत. त्यांनी असं सांगितलं आहे की, बदलायचे असेल तर मला अशी कोणतीही कल्पना नाही. पण, बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत. हे स्टेटमेंट म्हणजे बदलण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. पण, चर्चेचं उधाण एखाद्या मतदारसंघाबाबत करणे हे योग्य नाही, असं धैर्यशील माने म्हणाले. 

"शिवसेनेला जर उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याआधी बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही. मी स्वत: एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो, शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक कामात गुंतला आहे. भाजपाचे कार्यकर्तेही कामात गुंतले आहेत. आता गती घेण्याची वेळ आहे. संभ्रम करण्याची वेळ नाही, कालची बातमी एप्रिल फुल म्हणून डोक्यातून काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून जे काम करायचं आहे, त्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे. कामाला लागण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. माझ्या पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर हा सिग्नल दिला आहे, त्यामुळे आता या शंका काढण्यात काही अर्थ नाही, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं. 

'स्वाभिमानीच्या नावाखाली लाचारी पत्करतात'

"यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांना लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचे कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, पहिल्या दिवसापासून ते डायलॉग मारत आहेत. पण, दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हे वैचारिक गणित नाही. ते साखर कारखानदारांसोबत युती करतात तेव्हा ती कोणती आयडॉलॉजी युती करतात.त्यामुळे ते आयडॉलॉजीकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्ट्रोरियल युतीकडे लक्ष देतात, मी कसा निवडून येईल. एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. 

टॅग्स :dhairyasheel maneधैर्यशील मानेShiv Senaशिवसेना