शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘तावडे हॉटेल’वर उद्यापासून हातोडा

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

प्रशासनाची तयारी : पोलीस बंदोबस्तासाठी दिले पत्र

कोल्हापूर : शहराच्या पूर्वभागात राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत इमारतींवर सोमवारपासून कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापालिकेला आज व उद्या सुटी असतानाही काही अधिकारी या कारवाईच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. सोमवारच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून मनपा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत तावडे परिसरातील अनाधिकृत बांधकामावर खडाजंगी चर्चा झाल्यानंतर प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ताराराणी चौक विभागीय कार्यालयाचे उपअभियंता एम. एम. निर्मळे आणि त्यांचे सहकारी आज दिवसभर सोमवारपासून करायच्या कारवाईचे नियोजन करत होते. महानगरपालिकेची हद्द असतानाही उचगांव ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन १०९ इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही जागा या ट्रक टर्मिनस व कचरा डेपोसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आधी आरक्षित जागेवरील इमारती पाडण्यात येणार असून अशा इमारती किती आहेत याची यादी तयार केली जात आहे. त्यानंतर आरक्षण नसलेल्या जागांवरील इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची राहील हे न्यायालयाचे निर्देश, बीपीएमसी अ‍ॅक्टमधील तरतुदी याचा अभ्यास करूनच ठरविले जाणार आहे. आधी सर्व इमारत मालकांच्यावतीने उचगांव ग्रामपंचायतीने जागेच्या हद्दीबाबत न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने ग्रामपंचायतीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईला हरकत घेत २३ इमारत मालकांनी वैयक्तिक याचिका दाखल केल्या आहेत. त्यातही ८ इमारतींवर कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे, १५ इमारत मालकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. या १५ जणांना महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली होती. नोटिसीची मुदत संपताच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. काही इमारत मालकांचे सर्व्हे क्रमांक चुकले असल्याने त्यांना पुन्हा एकदा नोटीस काढण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. एकूण १०९ जागांपैकी ३३ जागांची गुंठेवारी प्रकरणे नियमीत करून देण्यात आली असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आरक्षण टाकण्यापूर्वी म्हणजे १९४६ पूर्वीपासून या जागेवर आठ घरे आहेत. त्यांनाही सवलत द्यावी लागण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जर आरक्षित जागेवरील इमारती पाडून त्यांची जागा महापालिकेने ताब्यात घ्यायचे ठरविले तर जागेच्या मूळ मालकांना मोबदला कोणी व किती द्यायचा याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)