शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

हातकणंगलेतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: December 19, 2014 00:20 IST

२१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे

दत्ता बीडकर - हातकणंगले -तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै २०१५ मध्ये संपत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. राखीव वॉर्डातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. २१ ग्रामपंचायतींच्या वॉर्ड (प्रभाग) रचना कार्यक्रमाला गती आली आहे. तसेच तालुक्यातील ६२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५ दिवसांत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कबनूर, चंदूर, जंगमवाडी, माणगाववाडी, माणगाव, तिळवणी, रूई, किणी, नेज, कुंभोज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी, मिणचे, लाटवडे, खोची, वाठार तर्फ उदगांव, तासगांव, वाठार तर्फ वडगांव, पाडळी, आणि मनपाडळे या २१ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने प्रभाग रचना सुरू केली जाते. त्याप्रमाणे प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. प्रभाग रचनेवरील हरकती सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता प्रभाग रचनेच्या कामामध्ये प्रशासन व्यस्त आहे. निवडणूक आयोगाने राखीव प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये जातप्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. २१ ग्रामपंचायतींसाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी २१ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत आपले वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव तालुका कार्यालयाकडे सादर करण्याची मुदत आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. पक्षापेक्षा ग्रामपातळीवरील आघाड्यांना महत्त्व दिले जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्यामुळे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नवीन सरपंच आरक्षणाप्रमाणे पार पडणार आहेत. मात्र आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ४१ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत ही याच पंधरा दिवसांत जाहीर होणार असल्याने पुढील अडीच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकाचे सरपंचही याचवेळी निश्चित होणार आहेत.तालुक्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यानंतर बाजार समिती, के.डी.सी.सी. आणि गोकुळबरोबर पंचगंगा साखर कारखाना निवडणुका मे २०१५ अखेर होणार असल्याने सहा महिने तालुक्यात निवडणुकीचे वारे आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे आपोआप तयार होत आहे.