शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: March 30, 2017 23:27 IST

दहावा वर्धापन दिन; सामाजिक बांधीलकी जपणारे दैनिक : माधुरी गायकवाड

कणकवली : ‘लोकमत’ हे सामाजिक बांधीलकी जपणारे दैनिक आहे. ‘लोकमत’ने अनेक उपक्रम राबवून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अल्पावधीतच हे वर्तमानपत्र सिंधुदुर्गात रूजले. गेल्या दहा वर्षांत वाटचाल यशस्वी असून लोकांशी जुळलेली नाळ कायम राहील, असे मत कणकवलीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या दहाव्या वर्धापनदिनाचे उद्घाटन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या हस्ते कणकवली जिल्हा कार्यालयानजीक झाले. यावेळी व्यासपीठावर महामार्ग पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संजय डौर, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर, प्रा. सतीश कामत, नीलम सावंत पालव, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, प्रा. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अबिद नाईक, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, उपसरव्यवस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, उपव्यवस्थापक मनुष्यबळ व प्रशासन संतोष साखरे, उपव्यवस्थापक इलेक्ट्रॉनिक्स भैय्यासाहेब देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक आयसीडी महावीर विभुते, आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक आदी उपस्थित होते.सभापती भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, ‘लोकमतने विविध पुरवण्यांद्वारे लाकांच्या मनात रूजले आहे. ‘लोकमत’मध्ये वाचनीय बातम्या असतात. महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या बातम्या लोकमतच्या मोठ्या प्रमाणात प्रसिध्द व्हाव्यात, असे लिखाण लोकमतने प्रसिध्द कराव्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर म्हणाले, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्राला ‘लोकमत’ने स्पर्श केला आहे. माणसाच्या मनातील गोष्टी ‘लोकमतने टिपल्या आहेत. बातम्या वाचून आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. आमचे जर काही चुकले असेल तर आम्हाला नेहमीच वाट दाखविली आहे. लोकांच्या नेहमीच समस्या मांडल्यामुळे लोकमत घराघरापर्यंत पोहोचवला आहे.वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, आम्ही लोकांना नवनवीन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज दररोज २२ लाख वाचकांच्या घरी दररोज लोकमत जातो. विचारामुळे लोक प्रेरित होत आहेत. मुलांनी काही तरी चांगले वाचावे या साठी ५ हजार शाळांमध्ये संस्कार मोतीच्या माध्यमातून मुले संस्कारीत करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल बक्षीस देण्यात आले आहे. लोकांशी जोडलेली नाळ आगामी काळात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. माजी नगराध्यक्ष मेघा गांगण म्हणाल्या, लोकमतने नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी बालविकास मंचची वैचारिक मांडणी केली आहे. वैचारिक पातळी उंचावण्यासाठी लोकमतचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर म्हणाले, आजचा हा दिवस अविस्मरणीय दिवस आहे. कारण सद्गुरूंचे कार्य करीत असताना लोकमतने संपूर्ण पान वामनराव पै यांच्या विचारांना दिले आहे. एवढी लोकमतची सद्गुरूंच्या कार्याशी नाळ जोडली आहे.अबिद नाईक म्हणाले, पत्रकार हा सर्वांमधील दुवा आहे. पत्रकार हा ज्ञान देत असतो. घरात बसून देशातील सर्व माहिती लोनांना मिळते. प्रा. सतीश कामत म्हणाले, फेरफटकामुळे लोकांशी नाते दृड झाले आहे. बालविकास मंच हे बालमनावर संस्कार करण्याचे काम करीत आहे. लोकमतने सामाजिक बांधिलकी जपून आज सर्वांपर्यत पोहोचला आहे. नीलम पालव म्हणाल्या, लोकमतच्या आॅक्सिजन पुरवणीने तर आम्ही वाडङ्मयीन आॅक्सिजन घेत आहोत. सखी पुरवणीमुणे तर लोकमत सर्व महिलांपर्यंत पोहोचला आहे. आता लोकमतने पाककला स्पर्धा घ्याव्यात. या साठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे त्या म्हणाल्या. प्रा. अनिल फराकटे यांनी लोकमत विचारांचे सदृढीकरण करीत आहे, असे सांगितले. प्रा. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, लोकमत हे निर्भिड दैनिक आहे. सर्व राज्यातील बातम्या लोकमतमध्ये वाचायला मिळतात. तसेच ते एक वाचनीय दैनिक आहे. (प्रतिनिधी)