शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

हापूस आंब्याची पेटी तीन हजारांत

By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST

भाज्यांच्या दरात घसरण : गवारी प्रतिकिलो ८० रुपये; कच्ची कैरी अन् द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण झाली आहे; तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, आंबा व हापूस आंब्याची आवक कोल्हापूर बाजार समितीत आली आहे, पण प्रत्यक्षात बाजारात हापूस आंबा दाखल झालेला नाही. आंब्याच्या एका पेटीचा दर तीन हजार रुपये आहे. लोणचे, गुळांबा व करम यांसाठी लागणारी कच्ची कैरी बाजारात दाखल झाली. कच्च्या कैरीचा दर (एक नग) २० रुपये होता. एकंदरीत, भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र होते. शहरातील सर्व बाजारपेठांत रविवारी द्राक्षे (थॉमसन, सोनाका प्रकार) व काळी द्राक्षे, वाटाणा शेंगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोनामाचा दर ८० ते शंभर रुपये, थॉमसनचा दर ५० ते ६० रुपये असा प्रतिकिलो होता. वाटाण्याच्या शेंगांचा दर प्रतिकिलो ४० रुपये असा होता. कोथिंबीर, मेथी, पोकळा यांचे दर स्थिर आहेत. प्रतिकिलो गवारी आता ८० रुपये झाली आहे. गतआठवड्यापेक्षा गवारीचा दर दहा रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, ओला वाटाणा ३५ रुपये झाला आहे. त्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मोसंबी, माल्टाचे दर घसरले. या आठवड्यात मोसंबी ६५० रुपये (चुमडे), २५० रुपये (चुमडे) आहे, तर चिक्कू, पेरू, सफरचंद, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, केळी (वसई), कवठ, स्ट्रॉबेरी यांची आवक वाढली आहे; पण दर स्थिर आहेत.गुळाच्या दरात वाढबाजारात गुळाची (रवे)आवक कमी झाल्याने दरामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाचा सरासरी दर आता ३२२५ रुपये झाला आहे. याचे कारण गुऱ्हाळ कमी झाल्याचे गूळ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात गूळ प्रतिकिलो ३५ रुपयांपासून ते ३७ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, गत चार महिन्यांतील गुळाच्या दरात झालेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी गुळाचा दर स्थिर होता.डाळींच्या दरात तब्बल आठ रुपयांनी वाढगत आठवड्यात बाजारात हरभराडाळ ४० रुपये प्रतिकिलो होती. ती आता ४८ रुपये, तूरडाळ ८२ रुपयांवरून ९० रुपये झाली. साखर २८ ते ३० रुपये, मूगडाळ १२० रुपये, मूग व मटकी शंभर रुपये, तीळ १६० रुपये, तर सरकी ७२ रुपये आहे. या सर्वांचे दर स्थिर आहेत.तासगाव, मिरज, सांगली, कागल या भागांमधून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत द्राक्षांचे दर कमी झाले आहेत.- शरद जगदने, फळविक्रेते, कोल्हापूर.कांदा, लसूण तेजीतघाऊक बाजारात कांद्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दहा किलोंचा सरासरी दर १३० रुपये, तर लसणाचा दर ४०० रुपये झाला आहे. कांदा व लसूण यांशिवाय जेवणाला पूर्णत्वच येत नाही; त्यामुळे जेवणामध्ये त्याचा सर्रास वापर असतो. त्यामुळे यांची मागणी स्थिरच असते.