शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंब्याची पेटी तीन हजारांत

By admin | Updated: February 9, 2015 00:38 IST

भाज्यांच्या दरात घसरण : गवारी प्रतिकिलो ८० रुपये; कच्ची कैरी अन् द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण झाली आहे; तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, आंबा व हापूस आंब्याची आवक कोल्हापूर बाजार समितीत आली आहे, पण प्रत्यक्षात बाजारात हापूस आंबा दाखल झालेला नाही. आंब्याच्या एका पेटीचा दर तीन हजार रुपये आहे. लोणचे, गुळांबा व करम यांसाठी लागणारी कच्ची कैरी बाजारात दाखल झाली. कच्च्या कैरीचा दर (एक नग) २० रुपये होता. एकंदरीत, भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र होते. शहरातील सर्व बाजारपेठांत रविवारी द्राक्षे (थॉमसन, सोनाका प्रकार) व काळी द्राक्षे, वाटाणा शेंगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोनामाचा दर ८० ते शंभर रुपये, थॉमसनचा दर ५० ते ६० रुपये असा प्रतिकिलो होता. वाटाण्याच्या शेंगांचा दर प्रतिकिलो ४० रुपये असा होता. कोथिंबीर, मेथी, पोकळा यांचे दर स्थिर आहेत. प्रतिकिलो गवारी आता ८० रुपये झाली आहे. गतआठवड्यापेक्षा गवारीचा दर दहा रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, ओला वाटाणा ३५ रुपये झाला आहे. त्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मोसंबी, माल्टाचे दर घसरले. या आठवड्यात मोसंबी ६५० रुपये (चुमडे), २५० रुपये (चुमडे) आहे, तर चिक्कू, पेरू, सफरचंद, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, केळी (वसई), कवठ, स्ट्रॉबेरी यांची आवक वाढली आहे; पण दर स्थिर आहेत.गुळाच्या दरात वाढबाजारात गुळाची (रवे)आवक कमी झाल्याने दरामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाचा सरासरी दर आता ३२२५ रुपये झाला आहे. याचे कारण गुऱ्हाळ कमी झाल्याचे गूळ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात गूळ प्रतिकिलो ३५ रुपयांपासून ते ३७ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, गत चार महिन्यांतील गुळाच्या दरात झालेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी गुळाचा दर स्थिर होता.डाळींच्या दरात तब्बल आठ रुपयांनी वाढगत आठवड्यात बाजारात हरभराडाळ ४० रुपये प्रतिकिलो होती. ती आता ४८ रुपये, तूरडाळ ८२ रुपयांवरून ९० रुपये झाली. साखर २८ ते ३० रुपये, मूगडाळ १२० रुपये, मूग व मटकी शंभर रुपये, तीळ १६० रुपये, तर सरकी ७२ रुपये आहे. या सर्वांचे दर स्थिर आहेत.तासगाव, मिरज, सांगली, कागल या भागांमधून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत द्राक्षांचे दर कमी झाले आहेत.- शरद जगदने, फळविक्रेते, कोल्हापूर.कांदा, लसूण तेजीतघाऊक बाजारात कांद्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दहा किलोंचा सरासरी दर १३० रुपये, तर लसणाचा दर ४०० रुपये झाला आहे. कांदा व लसूण यांशिवाय जेवणाला पूर्णत्वच येत नाही; त्यामुळे जेवणामध्ये त्याचा सर्रास वापर असतो. त्यामुळे यांची मागणी स्थिरच असते.