शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST

कोल्हापूर : कोरोना काळातील उपचार, ताण आणि औषधांच्या माऱ्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ही गळती रोखण्यासाठी पोस्ट कोविडनंतर ...

कोल्हापूर : कोरोना काळातील उपचार, ताण आणि औषधांच्या माऱ्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ही गळती रोखण्यासाठी पोस्ट कोविडनंतर आहार, व्यायामावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी पुढे दोन-तीन महिने विशेष काळजी घ्यावी लागते.

कोरोना झालेल्या व्यक्तीवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात औषध-गोळ्यांचा मारा करावा लागतो. दिवसाला ८ ते १० प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या दिल्या जातात. शिवाय सलाईन, इंजेक्शन असतातच. ज्यांना जास्त प्रमाणात संसर्ग झाला आहे, त्यांना रेमडेसिविरसारखे इंजेक्शन किंवा ऑक्सिजन लावण्यापर्यंतची वेळ येते. शरीरात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट बदलांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर, त्वचेवर आाणि केसांवर होत असतो. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणे, डोळे खोल जाणे, वजन कमी होणे, केस मोठ्या प्रमाणात गळणे अशा समस्या निर्माण होतात. या दुष्परिणामांमधून पूर्णत: बाहेर पडायला किमान तीन महिने लागतात. त्यामुळे पोस्ट कोविड ट्रिटमेंटही तितकीच महत्त्वाची असते.

--

कोविडनंतर तीन महिन्यांनी केस गळती

औषधांचा शरीरावर झालेला दुष्परिणाम पुढील महिन्याभरातच दिसायला लागतो. कोविडच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या आजारपणानंतर किंवा महिला बाळंत झाल्यानंतरदेखील केस मोठ्या प्रमाणात गळायला लागतात. शरीरातील पोषण कमी झाल्याचा हा परिणाम असतो. पण त्या दरम्यान चांगली काळजी घेतली की नंतर पुन्हा त्याच प्रमाणात नव्याने केस येतात.

--

हे करा

-औषधांमुळे शरीरातील गरमी खूप वाढते ती कमी करण्यासाठी व कमी झालेले पोषण भरून काढण्यासाठी सात्विक आणि समृद्ध आहार घ्या.

-जंक फूड, मसालेदार पदार्थ, चटण्या, लोणची असे पदार्थ टाळा.

-जेवणात, फोडणीत गाईच्या तुपाचा वापर करा.

-हिरव्या भाज्या आणि रसाळ फळे खा. जेवणात कोशिंबीरचे प्रमाण वाढवा.

- रोज किमान ३० मिनिटे चाला. खूप दमणूक करणारे व्यायाम टाळा.

-धातुवर्धक पदार्थ जसे गूळ, गव्हाची खीर, सोयाबीनची खीर, लापशी असे पदार्थ खा.

---

घरगुती उपाय

-आहारासोबतच केसांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक तेलाने केसांना मसाज, वाफ देणे, हार्ड शॅम्पूऐवजी रिठे-शिकेकाईचा वापर करा. तेलात कापूर घालून लावण्याचे केसांची मुळं घट्ट होतात, असे घरगुती उपाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.

---

त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारायचे असेल तर आहार आणि व्यायामावर विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोनात झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी आयुर्वेदात शीतवर्धक औषधे, शीरस्त पंचकर्म असे वेगवेगळे उपचार आहेत. शिवाय घरातच दोन तीन महिने चांगली काळजी घेतली तर केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

डॉ. मंजिरी घेवारी, आयुर्वेद तज्ज्ञ

--