शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोल्हापूरात अतिवृष्टीमुळे हाहा:कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 14:05 IST

वीजांच्या गडगडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहा:कार उघडला. ढगफुटीसारख्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहनेही वाहून गेली. पाचशेहून अधिक घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

ठळक मुद्दे ५०० हून अधिक घरात पाणी शिरले, अनेक वाहने वाहून गेली प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसानरस्ते उखडले, बेसमेंट बनले तलावखंडीत झालेला वीज पुरवठा यामुळे सर्वत्र घबराटकळंबा तलाव पुर्ण क्षमतेने भरला

कोल्हापूर : वीजांच्या गडगडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहा:कार उघडला. ढगफुटीसारख्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहनेही वाहून गेली. पाचशेहून अधिक घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरात शिरलेले पाणी, खंडीत झालेला वीज पुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.

कोल्हापूर शहरातील पावसाचे प्रमाण ठिकठिकाणी वेगळे होते, पण रात्री ११. ४५ ते २.४५ या कालावधीत सरासरी ७0 ते ८0 मि.मी.च्या दरम्यान पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की अवघ्या काही मिनिटात शहरातील ओढे, नाले, गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहायला लागले.

शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यांदा सोडली, आणि घरात पाणी शिरायला सुरवात झाली. शहरात अनेक घरातून पाणी तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यात पाणी शिरल्याने त्यातील घाण घरात पसरली.

शास्त्रीनगर, मोरेवाडी, अ‍ॅस्टर आधार, रायगड कॉलनी, जोतिर्लिंग हौसिंग सोसायटी परिसरातील चार चाकी वाहने, दुचाकी वाहने, रिक्षा वाहून गेली.रात्रीच्या पावसाने पाचगाव येथील सहा घरात पाणी शिरले. सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील व त्यांच्या सहकाºयांनी पाणी बाहेर काढण्यास रात्री ३ वाजता मदत केली. या पावसात त्यांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. उपनगरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे १00 ते १५0 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

उपनगरातील वर्षानगर, आर. के. नगर, राजेंद्र नगर, देवकर पाणंद, रामानंद नगर, कळंबा, पाचगांव परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. शहरातील पारीख पूलासह अनेक मार्ग बंद झाले. रामानंद नगर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुसळधार पावसात जयंतीनाला पाईपलाईनचे तीन भाग झाले आहेत.

उपनगरातील जरगनगर येथील नवीन पुलाजवळील रस्ता खचला असून जरगनागर येथील ओढ््याजवळ एक कार वाहून गेली आहे. साळोखेनगर येथील राजे संभाजी शाळेजवळ पूल खचला असून या पुलावरील रस्त्याला भगदाड पडले आहे. उजळाईवाडी विमानतळ रोडवरील नाल्यावरील बांधकाम वाहून गेले आहे. परिसरात ठिकठिकाणच्या ओहोळात धबधबे मात्र ओसंडून वाहत आहे.उपनगरातील नागरी वस्तीत पाणी घुसल्याने महापौर, आयुक्तांनी प्रशासनासह पाहणी केली.

दरम्यान, परिसरातील नागरिक नाले-सफाई आणि नाल्यावरील आतिक्रमणावरुन आक्रमक झाले आहेत. डायना बिल्ट येथे घरात घुसलेले पाणी बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी कंपाऊंडच्या भिंती फोडल्या. बोन्द्रेनगरात नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नागरी वस्तीत पाणी घुसले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी साईसृष्टी बिल्डरचे कार्यालय फोडले. बोन्द्रे नगर शिवशक्ती कॉलनी येथे घरांची कंपौंडची भिंत कोसळल्याने गटाराचे नाले बनले. पाचगांव मगदूम कॉलनीतील ओढ्यालगत असलेल्या जवळपास दहा बारा घरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचे पाणी शिरले.

दरम्यान, रात्रीच्या या जोरदार पावसाने कळंबा तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे. कळंबा तलावाची पाणी पातळी साडे तेवीस फुटावरून सत्तावीस फुटावर स्थिरावली आहे. तलाव काठोकाठ भरला असून अवघे सहा इंच पाणी वाढल्यास सांडव्यावरून पाणी उलटू लागेल, अशी स्थिती आहे.