शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मंत्र्यांसमोर नुसता दिखावा, फाईल जातात पुन्हा थप्पीला; कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील वास्तव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:22 IST

हा उपक्रम म्हणजे इव्हेंटच होत असल्याचे चित्र

कोल्हापूर : जनता दरबार सुरू झाल्यापासून दर महिन्याला न चुकता तक्रार अर्ज घेऊन येतो, पुढच्या महिन्याचा जनता दरबारला दाेन दिवस राहिले की विभागाकडून पत्र येते तुमच्या विषयावर कार्यवाही सुरू आहे, पाठपुरावा सुरू आहे, वस्तुस्थिती पडताळणी सुरू आहे, संबंधित विभागाला कळवले आहे, त्यापुढे काही गाडी सरकलेली नाही. वर्षानुवर्षे अधिकारी दाद घेत नाहीत म्हणून आम्ही इथे येतो, इथे मंत्र्यांसमोर अधिकारी होय होय म्हणतात फाइल काही पुढे सरकत नाही..असे अनुभव जनता दरबारसाठी उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी सोमवारी लोकमतला सांगितले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात दरबार भरवला जातो. सोमवारीही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सातशेच्यावर नागरिक आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने आले होते. यातील पाच-सहा लोकांची लोकमतने भेट घेतली व त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्या सर्वांचेच नुसतेच हेलपाटे झाले आहेत, एकाचेही काम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यातील काहींनी भीतीपोटी नावे सांगितली नाहीत.

माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांचे केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या पेन्शनमधील फरकाची जवळ १३-१४ लाख रुपये अडकले आहेत. कर्मचारी दरवेळी नवे कारण सांगतात. वैतागून बोललो की, फाइलमध्ये क्युरी काढेन अशी धमकीच देतात. मंत्र्यांकडून अर्ज परत तिथेच जातो आमचे प्रश्न कसे सुटणार..? - एक तक्रारदार, कागल 

शाहुपूरी हा रहिवास भाग असताना तिथे ऑइल मिल बेकायदेशीररीत्या सुरू आहे. प्रचंड प्रदूषण होते, अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याविरोधात २०१२ पासून पाठपुरावा करत आहे. महापालिका व पर्यावरणवाले एकमेकांवर ढकलतात. तीनही जनता दरबारमध्ये मी हा विषय मांडला आहे. मंत्र्यांसमोर सगळे अधिकारी होय होय म्हणत मान हलवतात, आम्हाला पत्र पाठवतात पण पुढे कार्यवाही करत नाहीत. - रहिवासी, कोल्हापूर.

जमिनीच्या फेरफारीत चुकीची नोंद झाली आहे. माझ्या हक्काची जमीन, विहीर या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याला देऊन टाकली. आता चुकीचं आहे तेच बरोबर म्हणून सांगतात, शासनाने न्याय दिला नाही तर आमच्यासारख्यांनी जायचं कुठे..? - सीताराम पाटील, कपिलेश्वर, ता. राधानगरी

कोल्हापूर महापालिकेअंतर्गत मी २००८ ते २०१३ पर्यंत रस्त्यांचे काम करून दिले. त्यावेळी भरलेले डिपॉझीट १० वर्षे झाले तरी मिळालेले नाही. पाठपुरावा करून दमलो म्हणून मागच्या जनता दरबारला आलो, दोन दिवसांपूर्वी उत्तर मिळाले तुमच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे. महिन्याभरात काही झाले नाही. महापालिकेचा भोंगळ कारभार आहे. - रविराज मोहिते. कॉन्ट्रॅक्टर

यावर उपाय काय..?सध्याच्या लोकशाही दिनाचा फक्त अर्ज स्वीकारले यापेक्षा जास्त काही उपयोग होत नाही. पालकमंत्र्यांनी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले एवढेच काय ते समाधान. त्याउपर हा उपक्रम म्हणजे इव्हेंटच होत असल्याचे चित्र दिसते. ते तसे व्हायचे नसेल तर गेल्या लोकशाही दिनामध्ये आलेल्या लोकांच्या तक्रारींचे काय झाले यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी भर दिला पाहिजे. किती अर्ज आले व त्यातील किती लोकांचे प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा मंत्र्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची गरज आहे. तरच यंत्रणेवर त्याचा जरब बसू शकेल.

मेंढपाळाला मदतमागील आठवड्यात कागल येथील खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरसच्या हल्ल्यात मयत झाली. त्यांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजारांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याची सूचना केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री