शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: स्थलांतर, शाळेबाबत पालकमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्णय, पुरस्थितीचा घेतला आढावा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 27, 2023 17:30 IST

जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. 

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडूनही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, एक दरवाजा बंद झाला आहे त्यामुळे पुराच्या भीतीने स्थलांतरित केलेल्या नागरिकांना उद्या, शुक्रवारपासून आपआपल्या घरी परत पाठवून द्या अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. पुराच्या भीतीने गेले दोन दिवस बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा देखील उद्यापासून वाजणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी हॉलमध्ये पुरस्थितीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. पालकमंत्री केसरकर म्हणाले, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तसेच कुंभी, कासारी, व तुळशी धरण भरले असते तर पंचगंगेची पाणी पातळी ५ ते ७ फुटांनी वाढले असते. पण कुंभी, कासारी व तुळशी धरण अजून भरलेले नाही तसेच राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरवाजे उघडल्यावरही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. गुरुवारी ऑरेज अलर्ट आहे त्यामुळे एक दिवस थांबा, पाणी पातळी किती वाढते, कमी होते, परिस्थिती बघून शुक्रवारी सकाळी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना घरी पाठवा. अनेक दिवस त्यांना घराबाहेर ठेवणे योग्य नाही.परीक्षांसाठी वेळ..पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र या दोन दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये पेपर सुरु होते ते रद्द करावे लागले. पण त्याचा मुलांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होऊ देणार नाही. परीक्षा घेण्यासाठी वेगळी तारीख दिली जाईल असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर