शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Kolhapur: स्थलांतर, शाळेबाबत पालकमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्णय, पुरस्थितीचा घेतला आढावा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 27, 2023 17:30 IST

जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. 

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडूनही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर आहे, एक दरवाजा बंद झाला आहे त्यामुळे पुराच्या भीतीने स्थलांतरित केलेल्या नागरिकांना उद्या, शुक्रवारपासून आपआपल्या घरी परत पाठवून द्या अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. पुराच्या भीतीने गेले दोन दिवस बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा देखील उद्यापासून वाजणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी हॉलमध्ये पुरस्थितीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील बंद असलेले रस्ते, त्यांना पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. पालकमंत्री केसरकर म्हणाले, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तसेच कुंभी, कासारी, व तुळशी धरण भरले असते तर पंचगंगेची पाणी पातळी ५ ते ७ फुटांनी वाढले असते. पण कुंभी, कासारी व तुळशी धरण अजून भरलेले नाही तसेच राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरवाजे उघडल्यावरही पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. गुरुवारी ऑरेज अलर्ट आहे त्यामुळे एक दिवस थांबा, पाणी पातळी किती वाढते, कमी होते, परिस्थिती बघून शुक्रवारी सकाळी स्थलांतरित झालेल्या नागरिकांना घरी पाठवा. अनेक दिवस त्यांना घराबाहेर ठेवणे योग्य नाही.परीक्षांसाठी वेळ..पुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र या दोन दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये पेपर सुरु होते ते रद्द करावे लागले. पण त्याचा मुलांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होऊ देणार नाही. परीक्षा घेण्यासाठी वेगळी तारीख दिली जाईल असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरDipak Kesarkarदीपक केसरकर