शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

Kolhapur: उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्त्यासाठी लवकर पर्यायी मार्ग काढू, पालकमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:31 IST

संतप्त ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांवर सरबत्ती 

कोल्हापूर : सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या १५ तारखेच्या दौऱ्यात किमान हलक्या वाहनांना परवानगी देण्याबाबत उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता सुरू करण्याची विनंती करण्याचा तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पर्यायी मार्ग लवकर होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी ग्रामस्थांना दिले.युद्धजन्य स्थितीत कोल्हापूरविमानतळ परिसरातील उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी विशेषाधिकार वापरून १० मेपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रस्त्याला विरोध नाही मात्र पर्यायी रस्ता लवकर द्या, तोपर्यंत किमान हलक्या वाहनांचा मार्ग बंद करू नये, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी तासभर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यात पालकमंत्री आबिटकर, आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी करत गुरुवारपर्यंतची वेळ मागून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोकूळ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह तामगावचे सरपंच लक्ष्मण हराळे, राजू माने, महेश पिंपळे, लल्ला गवते, रावसाहेब पाटील, विठ्ठल पुजारी, विश्वास तरटे, हेमंत पाटील, अमोल गवळी, अभिजित मोहळकर, विकी मुजावर, भाईजान अन्सारी, बाळू गुरव, बाजीराव गंगाधर, दीपक देशमुख, अनिल पाटील, दीपक जाधव, माणिक जोंधळेकर, तानाजी सासने, संपत सासने आदी उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते.ऋतुराज पाटील, अमल महाडिक एकत्रदरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा आणि नियोजन बैठकीच्या निमित्ताने कट्टर विरोधक समोरासमोर आले. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी त्यांच्याशी चर्चा केली होती. याच बैठकीत आमदार अमल महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांनीही एकत्र येत, ग्रामस्थांची बाजू घेत पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच वाट बंदविमानतळासाठी जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच पावसाळ्याच्या तोंडावर वाट बंद केल्याने सर्व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पर्यायी रस्ता दिल्यानंतरच रस्ता बंद करण्याचे आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर ते न पाळल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. प्रशासनाने समझोता करार करावा, तोपर्यंत ग्रामस्थ बाहेर थांबतील, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थ घेत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर