शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Kolhapur: उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्त्यासाठी लवकर पर्यायी मार्ग काढू, पालकमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:31 IST

संतप्त ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांवर सरबत्ती 

कोल्हापूर : सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या १५ तारखेच्या दौऱ्यात किमान हलक्या वाहनांना परवानगी देण्याबाबत उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता सुरू करण्याची विनंती करण्याचा तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पर्यायी मार्ग लवकर होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी ग्रामस्थांना दिले.युद्धजन्य स्थितीत कोल्हापूरविमानतळ परिसरातील उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी विशेषाधिकार वापरून १० मेपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रस्त्याला विरोध नाही मात्र पर्यायी रस्ता लवकर द्या, तोपर्यंत किमान हलक्या वाहनांचा मार्ग बंद करू नये, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी तासभर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यात पालकमंत्री आबिटकर, आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी करत गुरुवारपर्यंतची वेळ मागून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोकूळ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह तामगावचे सरपंच लक्ष्मण हराळे, राजू माने, महेश पिंपळे, लल्ला गवते, रावसाहेब पाटील, विठ्ठल पुजारी, विश्वास तरटे, हेमंत पाटील, अमोल गवळी, अभिजित मोहळकर, विकी मुजावर, भाईजान अन्सारी, बाळू गुरव, बाजीराव गंगाधर, दीपक देशमुख, अनिल पाटील, दीपक जाधव, माणिक जोंधळेकर, तानाजी सासने, संपत सासने आदी उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते.ऋतुराज पाटील, अमल महाडिक एकत्रदरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा आणि नियोजन बैठकीच्या निमित्ताने कट्टर विरोधक समोरासमोर आले. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी त्यांच्याशी चर्चा केली होती. याच बैठकीत आमदार अमल महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांनीही एकत्र येत, ग्रामस्थांची बाजू घेत पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच वाट बंदविमानतळासाठी जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच पावसाळ्याच्या तोंडावर वाट बंद केल्याने सर्व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पर्यायी रस्ता दिल्यानंतरच रस्ता बंद करण्याचे आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर ते न पाळल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. प्रशासनाने समझोता करार करावा, तोपर्यंत ग्रामस्थ बाहेर थांबतील, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थ घेत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर