शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

महायुतीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: October 6, 2015 23:45 IST

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसला रोखण्यासाठी सहकार्य घेण्याची तयारी

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुतीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार शिवसेना ८, भाजप ८ आणि आरपीआय १ या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी व्यापारी व नगरविकास आघाडीला सामावून घेण्याची महायुतीची तयारी आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, शिवसेना तालुका संघटक नंदू शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे म्हणाले, शिवसेना, भाजप, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून महायुतीच्या जागावाटपाचा एकमुखी निर्णय घेतला आहे. कोणी कोणत्या प्रभागात लढायचे हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्यापारी तसेच नगरविकास आघाडी व काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नसणाऱ्या व सक्षम उमेदवार देवू शकणाऱ्या अन्य कोणत्याही पक्षाची आमच्यासोबत येण्याची तयारी असेल तर त्यांना आम्ही सामावून घेऊ, असे रावराणे द्वयींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी फक्त काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी गेल्या पन्नास वर्षात सत्ता उपभोगून शहराची आणि गावाची पुरती वाट लावली आहे. वाभवे-वैभववाडीची अवस्था कणकवली, मालवणसारखी आम्हाला होऊ द्यायची नाही. त्यामुळे पन्नास वर्षात काहीही करू न शकलेले पुन्हा सत्तेत येवून वेगळे काय करणार आहेत? असा सवाल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)गावाला स्मशानभूमीसुद्धा नाहीकाँग्रेसच्या अधिपत्याखाली इतकी वर्षे वाभवे-वैभववाडीचा कारभार सुरू होता. मात्र, करोडो रुपयांचा चुराडा करूनही शहरासह गावाला बारमाही पुरेसे पिण्याचे पाणी ते देवू शकत नाहीत. गावासाठी हक्काची स्मशानभूमी निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्या हातात नगरपंचायत देवून लोकांचा फायदा काय? शहरात अनैतिक धंदे करणारे पदाधिकारी कोणाचे आहे, असे प्रश्न महायुतीतर्फे उपस्थित करण्यात आले.उपक्रमांचा दिखाऊपणावाभवे-वैभववाडी शहरात तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तालुका सुरक्षित राहणार आहे का? मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या वायफाय सेवेचा लाभ नगरपंचायतीच्या १७ पैकी किती प्रभागात मिळतो? आणि त्या सेवेची सध्याची स्थिती काय आहे असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी राबविलेले उपक्रम आमच्यासाठी आता फायदेशीर ठरत आहेत, असे जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे यांनी सांगितले.