शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महायुतीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: October 6, 2015 23:45 IST

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसला रोखण्यासाठी सहकार्य घेण्याची तयारी

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुतीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार शिवसेना ८, भाजप ८ आणि आरपीआय १ या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी व्यापारी व नगरविकास आघाडीला सामावून घेण्याची महायुतीची तयारी आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, आरपीआय तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, शिवसेना तालुका संघटक नंदू शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे म्हणाले, शिवसेना, भाजप, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून महायुतीच्या जागावाटपाचा एकमुखी निर्णय घेतला आहे. कोणी कोणत्या प्रभागात लढायचे हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्यापारी तसेच नगरविकास आघाडी व काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नसणाऱ्या व सक्षम उमेदवार देवू शकणाऱ्या अन्य कोणत्याही पक्षाची आमच्यासोबत येण्याची तयारी असेल तर त्यांना आम्ही सामावून घेऊ, असे रावराणे द्वयींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी फक्त काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी गेल्या पन्नास वर्षात सत्ता उपभोगून शहराची आणि गावाची पुरती वाट लावली आहे. वाभवे-वैभववाडीची अवस्था कणकवली, मालवणसारखी आम्हाला होऊ द्यायची नाही. त्यामुळे पन्नास वर्षात काहीही करू न शकलेले पुन्हा सत्तेत येवून वेगळे काय करणार आहेत? असा सवाल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)गावाला स्मशानभूमीसुद्धा नाहीकाँग्रेसच्या अधिपत्याखाली इतकी वर्षे वाभवे-वैभववाडीचा कारभार सुरू होता. मात्र, करोडो रुपयांचा चुराडा करूनही शहरासह गावाला बारमाही पुरेसे पिण्याचे पाणी ते देवू शकत नाहीत. गावासाठी हक्काची स्मशानभूमी निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्या हातात नगरपंचायत देवून लोकांचा फायदा काय? शहरात अनैतिक धंदे करणारे पदाधिकारी कोणाचे आहे, असे प्रश्न महायुतीतर्फे उपस्थित करण्यात आले.उपक्रमांचा दिखाऊपणावाभवे-वैभववाडी शहरात तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तालुका सुरक्षित राहणार आहे का? मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या वायफाय सेवेचा लाभ नगरपंचायतीच्या १७ पैकी किती प्रभागात मिळतो? आणि त्या सेवेची सध्याची स्थिती काय आहे असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी राबविलेले उपक्रम आमच्यासाठी आता फायदेशीर ठरत आहेत, असे जयेंद्र रावराणे व प्रमोद रावराणे यांनी सांगितले.