शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

मदतीच्या प्रतीक्षेत द्राक्ष बागायतदार

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेची

संदीप बावचे -जयसिंगपूर -अवकाळीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांमुळे नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यामुळे द्राक्ष बागातदारांना तरी नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवकाळी आणि ढगाळ हवामानामुळे गणेशवाडी, निमशिरगाव, शेडशाळ, दानोळी, टाकळी, नांदणी, जैनापूर, आदी गावांतील द्राक्ष बागायतदार हवालदील झाले होते. सुमारे आठशे एकर द्राक्षबागा या परिसरात आहेत. बदलत्या हवामानामुळे द्राक्षकूज, मणीगळ, दावणी, आदी रोगांचा प्रादुर्भाव खास करून जाणवला होता. अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे या पिकाला जणू ग्रहणच लागले. शेतकरी भयभीत झाला. सतत पावसाच्या होणाऱ्या माऱ्यामुळे द्राक्ष घड कुजण्याच्या, तर पाणी साठल्यामुळे द्राक्ष मणी गळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अस्मानी संकटानंतरही शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. एकूणच उत्पादनाचा महागडा खर्च, औषध फवारणीत येणारा व्यत्यय, मजुरांचा तुटवडा व हवामानाच्या न येणाऱ्या अंदाजामुळे द्राक्ष बागयतदारांचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कायम स्वरूपी संरक्षण देऊन द्राक्ष पिकांना आधारभूत किंमत शासनाने ठरवावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे. हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेचीअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना यापूर्वी हेक्टरी १२ हजार रुपये नुकसान भरपाई मिळत होती. द्राक्ष पिकासाठी येणारा औषधांचा खर्च पाहता शासनाकडून मिळणारी ही मदत तुटपुंजीच ठरणार आहे. वास्तविक भूगोल शास्त्रानुसार ग्लोबल वार्मिंगचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून वातावरणातील हवामानाची ठोस माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. तरच द्राक्ष बागायतदारांना पिकांचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.