शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

मदतीच्या प्रतीक्षेत द्राक्ष बागायतदार

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेची

संदीप बावचे -जयसिंगपूर -अवकाळीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांमुळे नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यामुळे द्राक्ष बागातदारांना तरी नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवकाळी आणि ढगाळ हवामानामुळे गणेशवाडी, निमशिरगाव, शेडशाळ, दानोळी, टाकळी, नांदणी, जैनापूर, आदी गावांतील द्राक्ष बागायतदार हवालदील झाले होते. सुमारे आठशे एकर द्राक्षबागा या परिसरात आहेत. बदलत्या हवामानामुळे द्राक्षकूज, मणीगळ, दावणी, आदी रोगांचा प्रादुर्भाव खास करून जाणवला होता. अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे या पिकाला जणू ग्रहणच लागले. शेतकरी भयभीत झाला. सतत पावसाच्या होणाऱ्या माऱ्यामुळे द्राक्ष घड कुजण्याच्या, तर पाणी साठल्यामुळे द्राक्ष मणी गळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अस्मानी संकटानंतरही शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. एकूणच उत्पादनाचा महागडा खर्च, औषध फवारणीत येणारा व्यत्यय, मजुरांचा तुटवडा व हवामानाच्या न येणाऱ्या अंदाजामुळे द्राक्ष बागयतदारांचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कायम स्वरूपी संरक्षण देऊन द्राक्ष पिकांना आधारभूत किंमत शासनाने ठरवावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे. हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेचीअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना यापूर्वी हेक्टरी १२ हजार रुपये नुकसान भरपाई मिळत होती. द्राक्ष पिकासाठी येणारा औषधांचा खर्च पाहता शासनाकडून मिळणारी ही मदत तुटपुंजीच ठरणार आहे. वास्तविक भूगोल शास्त्रानुसार ग्लोबल वार्मिंगचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून वातावरणातील हवामानाची ठोस माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. तरच द्राक्ष बागायतदारांना पिकांचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.