शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

राज्यशासनाचे विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी दीड लाखापर्यंत अनुदान, राज्यातील 'इतक्या' संस्थांना लाभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 10:50 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या व्याज सवलत योजनेमुळे विकास संस्थांच्या उत्पन्नात घट झाल्याने व्यवस्थापनासह इतर खर्चामुळे ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या व्याज सवलत योजनेमुळे विकास संस्थांच्या उत्पन्नात घट झाल्याने व्यवस्थापनासह इतर खर्चामुळे संस्था आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाल्या आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पीक कर्ज वाटपावर १.५ टक्यांऐवजी २ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून दीड लाखांपर्यंत मदत होणार असून या निर्णयाचा राज्यातील १७ हजार विकास संस्थांना लाभ होणार आहे.

राज्यात शेतकऱ्यांना राज्य बँक, जिल्हा बँक व विकास संस्था असा त्रिस्तरीय पध्दतीने पीक कर्जाचा पुरवठा होताे. जिल्हा बँक विकास संस्थांना ४ टक्के तर संस्था शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने पीक कर्ज देते. मात्र राज्य व केंद्र सरकारने तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज विनाव्याज देण्याचा निर्णय घेतला. यापोटी संस्थेला २ टक्के परतावा मिळतो. हा परतावा व मध्यम मुदतीचे कर्ज वाटपातून मिळणारे उत्पन्नातून संस्थेचा व्यवस्थापन, आस्थापना खर्च भागत नाही. अनेक संस्थांना निवडणुकीसाठी कर्ज घ्यावे लागते. संस्थांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज वाटपाच्या प्रमाणात ०.५० पासून १.५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यात ०.२५ ते ०.५० टक्के वाढ केली असून त्यामुळे सरासरी संस्थांना दीड लाख रुपये अनुदान मिळणार आहे. राज्यात २२ हजार विकास संस्था असून निकषानुसार १७ हजार पात्र संस्थांना या योजनेचा लाभ होणार आहे.

अनुदानासाठी हे असतील निकष

- विहीत कालावधीत लेखापरीक्षण पूर्ण करणे अन्यथा लाभ नाही.

- सर्वसाधारण सभेत नोंद घेऊन सहकार विभागामार्फत ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करणे.

- ५० लाखांपर्यंत पीक कर्ज वाटप संस्थेचा व्यवस्थापन व आस्थापना खर्च खेळत्या भांडवलाच्या २.५ टक्के असावा.

- ५० लाखांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप संस्थेचा खर्च ३ टक्कांपेक्षा अधिक नसावा.

- आर्थिक गैरव्यवहार झालेल्या संस्था अपात्र होणार

- पीक कर्जाची वसुलीचे प्रमाण किमान ५० टक्के असावे.

- ५० टक्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या जिल्ह्यासाठी वसुलीचे प्रमाण २५ टक्के असावे.

असे मिळणार अनुदान -

- २५ लाखांपर्यंत कर्ज वाटप- १.५ ऐवजी २ टक्के

- २५ ते ५० लाखांपर्यंत कर्ज वाटप - १ ऐवजी १.५० टक्के

- ५० लाख ते १ कोटी कर्ज वाटप - ०.७५ ऐवजी १ टक्के

- १ कोटीपेक्षा अधिक कर्ज वाटप - ०.५० ऐवजी ०.७५ टक्के

राज्य सरकारच्या पातळीवर गेली अनेक महिने प्रयत्न सुरू होते. या योजनेमुळे विकास संस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे. - प्रकाश तिपन्नावार (जिल्हा प्रतिनिधी, गट सचिव संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर