शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

रेशनवरील हरभरा आणि उडीद डाळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 14:27 IST

रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल.

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेशनवरील हरभरा व उडीदडाळ महागली आहे. पुढील महिन्यापासून हरभराडाळ प्रति किलो ४० व उडीदडाळ ५५ रुपये या वाढीव दराने विकली जाईल. जिल्ह्यासाठी दोन्ही मिळून ११०० टन डाळींची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त सरकारने रेशनवर प्रतिकिलो ३५ दराने हरभराडाळ व ४४ रुपयांनी उडीदडाळ देण्याची घोषणा केली होती; परंतु हे दर सर्वसामान्यांना परवडणार नसल्याने दुकानदारांनी ती न उचलण्याचा पवित्रा घेतला होता; परंतु सरकारने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही डाळ उपलब्ध करून दिली नाही.

त्यामुळे या डाळीविनाच ग्राहकांना दिवाळी साजरी करावी लागली. त्यानंतर ही डाळ रेशनवर यायला सुरुवात झाली; परंतु ती पुरेशा प्रमाणात नसल्याने दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातच आता शासनाने या डाळींचे दर वाढविले असून, हरभराडाळीचा दर ४० रुपये व उडीदडाळीचा दर ५५ रुपये केला आहे. या वाढीव दराने पुढील महिन्यापासून विक्री करण्यात येणार आहे.

खुल्या बाजारात हरभरा डाळीचा दर प्रतिकिलो जवळपास ८० रुपये व उडीद डाळीचा दर ९० रुपयांच्या आसपास आहे. या दराने डाळ घेणे सर्वसामान्य ग्राहकांना एक दिव्यच होऊन बसले आहे. त्यातच रेशनवर डाळ उपलब्ध करून दिल्याने थोडासा दिलासा मिळाला होता; परंतु त्याचे दर वाढल्याने ग्राहकांना झळ बसणार असल्याने त्यांच्या रोषाला रेशन दुकानदारांसह पुरवठा विभागालाही येणाऱ्या काळात सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार डाळजिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे हरभराडाळ ५५० टन व उडीदडाळ ५५० टन असे ११०० टन डाळींची मागणी केली आहे. मागणीप्रमाणे डाळ शासकीय गोदामांमध्ये यायला सुरुवातही झाली आहे. महिनाअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने ती येणार आहे. अंत्योदय ५१ हजार व प्राधान्य ४ लाख ९९ हजार रेशन कार्डधारक कुटुंबांना एक किलोप्रमाणे ही डाळ दिली जाईल. 

रेशनवरील हरभरा व उडीदडाळींचा दर वाढला असला तरी तो खुल्या बाजारातील डाळींपेक्षा कमी आहे. तसेच रेशनवरील डाळ ही उत्तम प्रतीची व दर्जेदार असून ती एक किलोच्या पॅकेटमध्ये सीलबंद केलेली आहे. शासकीय गोदामात डाळ यायला सुरुवात झाली असून, पुढील महिन्यापासून वाढीव दराने तिची विक्री होईल.- अमित माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

हरभराडाळ व उडीदडाळ सध्या रेशनवर पूर्ण क्षमतेने येत नाहीत; त्यामुळे ग्राहकांचा दुकानदारांवर रोष आहे. त्यातच सरकारने डाळींचे दर वाढवून या रोषात भर पाडली आहे. यामुळे दुकानदारांची अडचण झाली असून, त्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. ही वाढ निषेधार्ह आहे. ती त्वरित मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती