शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आधार संलग्न नसलेल्या शिधापत्रिकांचे धान्य जूनपासून बंद : विवेक आगवणे

By admin | Updated: May 16, 2017 18:39 IST

दुसऱ्या ‘थंब’ होणार कॅशलेस व्यवहार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्यांच्या शिधापत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा आधार क्रमांक संलग्नित झालेला नाही, अशा शिधापत्रिकेवरील धान्याचे वितरण १ जूनपासून बंद केले जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रेशन दुकानदारांसह क्षेत्रिय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व घटकांची सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक व त्यांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांचे आधार संलग्नीकरण केले जात आहे. त्यात कुटुंबातील एक-दोन सदस्यांचे आधार संलग्नीकरण नसल्यास, आधारची ओळख पटवून देण्यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास सध्या तरी अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मात्र, आधार संलग्नीकरण बंधनकारक असून ते सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये ‘ईपोओएस’ (ई-पाँईट आॅफ सेल मशीन) वर लाभार्थीने पहिल्यांदा थंब केल्याने त्यांना वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याची पावती मिळते. या ईपीओएसच्या प्रणालीत सुधारणा केली जात आहे. त्यात दुसरा थंब केल्यानंतर त्याला वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याचे होणारे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यातून दुकानदाराच्या खात्यात वर्ग होतील. ही प्रणाली लवकरच विकसित केली जाईल. वृद्ध लाथार्थ्यांनी थंब केल्यानंतर ते नीट होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी वृद्धांच्या हाताच्या सर्व बोटांचे थंब इम्प्रेशन होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘ईपीओएस’ वापरामध्ये राज्यात आघाडीवर जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत साडेपाच लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील दोन लाख शिधापत्रिकांचे ‘ईपीओएस’द्वारे धान्य वितरण केले आहे. त्यातील प्रत्येक व्यवहार ‘ईपीडीएस’ (ई-सार्वजनिक वितरण प्रणाली) या संगणक प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.

‘ईपीओएस’ वापरात कोल्हापूर राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात १५७१ रेशन दुकाने असून त्यापैकी १५६७ दुकानांमध्ये ‘ईपीओएस’ कार्यान्वित आहेत. याद्वारे दि. १ ते १६ मेदरम्यान २ लाख ५५ हजार झाले असून ६३ लाख किलो धान्याचे वितरण केले आहे. त्यात गहू, तांदूळ, साखर आदींचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात एकूण ५ लाख ९६ हजार व्यवहार झाले आहेत.

‘ग्रास’ प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा भरणा शंभर टक्के आॅनलाईन होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कार्यशाळा ‘ईपीओएस’च्या वापरात कोल्हापूरने राबविलेली कार्यपद्धती, प्रणालीबाबत कोल्हापूर विभागातील अन्य जिल्ह्यांतील पुरवठा विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, तांत्रिक आधिकारी उपस्थित असतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले.