शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधार संलग्न नसलेल्या शिधापत्रिकांचे धान्य जूनपासून बंद : विवेक आगवणे

By admin | Updated: May 16, 2017 18:39 IST

दुसऱ्या ‘थंब’ होणार कॅशलेस व्यवहार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्यांच्या शिधापत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा आधार क्रमांक संलग्नित झालेला नाही, अशा शिधापत्रिकेवरील धान्याचे वितरण १ जूनपासून बंद केले जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रेशन दुकानदारांसह क्षेत्रिय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व घटकांची सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक व त्यांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांचे आधार संलग्नीकरण केले जात आहे. त्यात कुटुंबातील एक-दोन सदस्यांचे आधार संलग्नीकरण नसल्यास, आधारची ओळख पटवून देण्यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास सध्या तरी अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मात्र, आधार संलग्नीकरण बंधनकारक असून ते सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये ‘ईपोओएस’ (ई-पाँईट आॅफ सेल मशीन) वर लाभार्थीने पहिल्यांदा थंब केल्याने त्यांना वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याची पावती मिळते. या ईपीओएसच्या प्रणालीत सुधारणा केली जात आहे. त्यात दुसरा थंब केल्यानंतर त्याला वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याचे होणारे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यातून दुकानदाराच्या खात्यात वर्ग होतील. ही प्रणाली लवकरच विकसित केली जाईल. वृद्ध लाथार्थ्यांनी थंब केल्यानंतर ते नीट होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी वृद्धांच्या हाताच्या सर्व बोटांचे थंब इम्प्रेशन होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘ईपीओएस’ वापरामध्ये राज्यात आघाडीवर जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत साडेपाच लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील दोन लाख शिधापत्रिकांचे ‘ईपीओएस’द्वारे धान्य वितरण केले आहे. त्यातील प्रत्येक व्यवहार ‘ईपीडीएस’ (ई-सार्वजनिक वितरण प्रणाली) या संगणक प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.

‘ईपीओएस’ वापरात कोल्हापूर राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात १५७१ रेशन दुकाने असून त्यापैकी १५६७ दुकानांमध्ये ‘ईपीओएस’ कार्यान्वित आहेत. याद्वारे दि. १ ते १६ मेदरम्यान २ लाख ५५ हजार झाले असून ६३ लाख किलो धान्याचे वितरण केले आहे. त्यात गहू, तांदूळ, साखर आदींचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात एकूण ५ लाख ९६ हजार व्यवहार झाले आहेत.

‘ग्रास’ प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा भरणा शंभर टक्के आॅनलाईन होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कार्यशाळा ‘ईपीओएस’च्या वापरात कोल्हापूरने राबविलेली कार्यपद्धती, प्रणालीबाबत कोल्हापूर विभागातील अन्य जिल्ह्यांतील पुरवठा विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, तांत्रिक आधिकारी उपस्थित असतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले.