शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आधार संलग्न नसलेल्या शिधापत्रिकांचे धान्य जूनपासून बंद : विवेक आगवणे

By admin | Updated: May 16, 2017 18:39 IST

दुसऱ्या ‘थंब’ होणार कॅशलेस व्यवहार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्यांच्या शिधापत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा आधार क्रमांक संलग्नित झालेला नाही, अशा शिधापत्रिकेवरील धान्याचे वितरण १ जूनपासून बंद केले जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

रेशन दुकानदारांसह क्षेत्रिय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व घटकांची सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक व त्यांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांचे आधार संलग्नीकरण केले जात आहे. त्यात कुटुंबातील एक-दोन सदस्यांचे आधार संलग्नीकरण नसल्यास, आधारची ओळख पटवून देण्यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास सध्या तरी अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मात्र, आधार संलग्नीकरण बंधनकारक असून ते सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये ‘ईपोओएस’ (ई-पाँईट आॅफ सेल मशीन) वर लाभार्थीने पहिल्यांदा थंब केल्याने त्यांना वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याची पावती मिळते. या ईपीओएसच्या प्रणालीत सुधारणा केली जात आहे. त्यात दुसरा थंब केल्यानंतर त्याला वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याचे होणारे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यातून दुकानदाराच्या खात्यात वर्ग होतील. ही प्रणाली लवकरच विकसित केली जाईल. वृद्ध लाथार्थ्यांनी थंब केल्यानंतर ते नीट होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी वृद्धांच्या हाताच्या सर्व बोटांचे थंब इम्प्रेशन होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘ईपीओएस’ वापरामध्ये राज्यात आघाडीवर जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत साडेपाच लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील दोन लाख शिधापत्रिकांचे ‘ईपीओएस’द्वारे धान्य वितरण केले आहे. त्यातील प्रत्येक व्यवहार ‘ईपीडीएस’ (ई-सार्वजनिक वितरण प्रणाली) या संगणक प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.

‘ईपीओएस’ वापरात कोल्हापूर राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात १५७१ रेशन दुकाने असून त्यापैकी १५६७ दुकानांमध्ये ‘ईपीओएस’ कार्यान्वित आहेत. याद्वारे दि. १ ते १६ मेदरम्यान २ लाख ५५ हजार झाले असून ६३ लाख किलो धान्याचे वितरण केले आहे. त्यात गहू, तांदूळ, साखर आदींचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात एकूण ५ लाख ९६ हजार व्यवहार झाले आहेत.

‘ग्रास’ प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा भरणा शंभर टक्के आॅनलाईन होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कार्यशाळा ‘ईपीओएस’च्या वापरात कोल्हापूरने राबविलेली कार्यपद्धती, प्रणालीबाबत कोल्हापूर विभागातील अन्य जिल्ह्यांतील पुरवठा विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, तांत्रिक आधिकारी उपस्थित असतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले.