शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश

By तानाजी पोवार | Updated: August 23, 2022 19:23 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे देण्यात आला आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे देण्यात आला आहे. त्यामुळे यासंबंधीची सुनावणी कोणत्या अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायालयात चालणार, याची स्पष्टता ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून द्यावी, असे आदेश मंगळवारी जिल्हा न्यायालयाने दिले. याबाबतची पुढील सुनावणी दि. ६ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.

ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येबाबत मंगळवारी जिल्हा न्यायाधीश -३ एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संशयित आरोपींवर दोषारोप निश्चिती करण्यात येणार होती; पण या प्रकरणाचा तपास हा ‘एसआयटी‘ (विशेष तपास पथक) कडून ‘एटीएस’कडे देण्यात आला. त्यामुळे खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात चालवता येते का? अशी शंका वकिलांनी व्यक्त केली. त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी ‘एटीएस’चे अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हते, म्हणून संशयितांचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पुण्याच्या येरवडा कारागृहातून तीन संशयितांना न्यायालयात आणले; पण बंगळुरू कारागृहातून इतर सहा संशयितांना आणण्यास उशिरा झाल्याने सुनावणी अर्ध्या तासासाठी तहकूब केली.

सहा संशयितांना आणल्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली. मुंबई आणि सोलापूर या दोन ठिकाणी ‘एटीएस’चे खटले चालविण्यासाठी खास न्यायालये असल्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हा खटला चालविता येतो का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्पष्टता देण्यासाठी ‘एटीएस’चे तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी ‘एटीएस’च्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही सुनावणी कोणत्या अधिकार क्षेत्र न्यायालयात चालविणार, याबाबत लेखी म्हणणे सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

संशयित समीर गायकवाडची हजेरी कोठे?

जामिनावर बाहेर असलेला संशयित समीर गायकवाड याची दर रविवारी ‘एसआयटी’कडे हजेरी होती. आता हा तपास ‘एटीएस’कडे वर्ग केला, त्यामुळे गायकवाड याने येथून पुढे ‘एसआयटी’कडे हजेरी देण्यास येऊ नये, असे सांगितल्याचे संशयितांचे वकील ॲड. पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतचा निर्णयही दि. ६ सप्टेंबरच्या सुनावणीवेळी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयGovind Pansareगोविंद पानसरेAnti Terrorist Squadएटीएस