शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’च्या परिपत्रकाने शासन अडचणीत

By admin | Updated: September 12, 2015 00:49 IST

एकरकमी’ला प्रतिसाद नाही : परिपत्रकातील त्रुटींमुळे निर्णयाची अंमलबजावणी कठीण

अविनाश कोळी- सांगलीराज्यातील भू-विकास बँका बंद करण्याचा निर्णय शासनालाच अडचणीत आणणारा ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकरकमी परतफेड योजनेस राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी भागविणे मुश्कील झाले आहे. त्याशिवाय शासनाच्या परिपत्रकात अनेक त्रुटी असल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी वर्षभराच्या कालावधीत होणे कठीण दिसत आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या भू-विकास बँका बंद करण्याच्या निर्णयानंतर दोन महिन्यांनी जुलै महिन्यात शासनाने याबाबत परिपत्रक काढले. सक्षम बँका आणि कर्मचाऱ्यांच्या देण्यांबाबत घेतलेले निर्णय यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. चार्टर्ड अकौंटंट डी. ए. चौगुले समिती आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड अशा ११ बँका त्यांचे दायित्व देण्यास समर्थ आहेत. यातील कोल्हापूर व नाशिक या बँकांबाबत कोणता निर्णय घ्यायचा, याबाबतचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. अन्य नऊ सक्षम बँकांच्या अवसायनाचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने ज्या भू-विकास बँकांच्या अवसायनास स्थगिती दिली आहे, अशा बँकांबाबतचा निर्णयही निकालानंतर घेतला जाणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीचा विचार केल्यास, अवसायक नसलेल्या ठिकाणी निवडणुका लावाव्या लागतात. मात्र, सहकार कायद्यातील दुरुस्ती आणि शासन परिपत्रक यामध्येच ताळमेळ दिसत नाही. शासन परिपत्रकानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) व इतर वैधानिक देणी कर्ज वसुलीतून अदा करण्यात येणार आहेत. आजवरच्या एकरकमी योजनेतून थकीत कर्ज वसुलीसाठी मिळालेला प्रतिसाद पाहता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘सलाईन’वरच राहावे लागणार आहे. कर्ज वसुलीतून देणी भागवता येत नसतील, तर बँकांच्या मालमत्तांवर टाच येणार आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने एकरकमी परतफेड योजनेचे भवितव्य अंधारात सापडले आहे. कर्ज वसुलीसाठी आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून इतरांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ५0 पेक्षा ज्यांचे वय कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवून त्यांचा कर्ज वसुलीसाठी वापर केल्यास, त्यांची पन्नाशी ओलांडू शकते. अशावेळी त्यांची अन्य शासकीय सेवेतील दावेदारी संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे याचीही चिंता कर्मचाऱ्यांना लागली आहे. येणी-देणी समायोजनबँकांकडून शासनाला येणाऱ्या १८९७ कोटी २४ लाखांतून शासनाकडून बँकांना देणे असलेल्या ६0७ कोटी रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. मात्र, चौगुले समितीच्या शिफारशीप्रमाणे समायोजन झाले असते, तर बँकांना त्याचा अधिक फायदा झाला असता.दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणाऱ्या भू-विकास बॅँका बंद करण्याची घाई शासनाने का केली, असा प्रश्न आता कर्मचारी व शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. राज्यातील भू-विकास बॅँकाचा पसारा मोठा आहे. दुष्काळी परिस्थितीत या बॅँकांचा शेतकऱ्यांना सर्वांत जास्त लाभ झाला असता. मात्र, बॅँका बंद करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करण्याचा एक सक्षम पर्याय संपला आहे.