शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’च्या परिपत्रकाने शासन अडचणीत

By admin | Updated: September 12, 2015 00:49 IST

एकरकमी’ला प्रतिसाद नाही : परिपत्रकातील त्रुटींमुळे निर्णयाची अंमलबजावणी कठीण

अविनाश कोळी- सांगलीराज्यातील भू-विकास बँका बंद करण्याचा निर्णय शासनालाच अडचणीत आणणारा ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकरकमी परतफेड योजनेस राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी भागविणे मुश्कील झाले आहे. त्याशिवाय शासनाच्या परिपत्रकात अनेक त्रुटी असल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी वर्षभराच्या कालावधीत होणे कठीण दिसत आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या भू-विकास बँका बंद करण्याच्या निर्णयानंतर दोन महिन्यांनी जुलै महिन्यात शासनाने याबाबत परिपत्रक काढले. सक्षम बँका आणि कर्मचाऱ्यांच्या देण्यांबाबत घेतलेले निर्णय यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. चार्टर्ड अकौंटंट डी. ए. चौगुले समिती आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड अशा ११ बँका त्यांचे दायित्व देण्यास समर्थ आहेत. यातील कोल्हापूर व नाशिक या बँकांबाबत कोणता निर्णय घ्यायचा, याबाबतचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. अन्य नऊ सक्षम बँकांच्या अवसायनाचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने ज्या भू-विकास बँकांच्या अवसायनास स्थगिती दिली आहे, अशा बँकांबाबतचा निर्णयही निकालानंतर घेतला जाणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीचा विचार केल्यास, अवसायक नसलेल्या ठिकाणी निवडणुका लावाव्या लागतात. मात्र, सहकार कायद्यातील दुरुस्ती आणि शासन परिपत्रक यामध्येच ताळमेळ दिसत नाही. शासन परिपत्रकानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) व इतर वैधानिक देणी कर्ज वसुलीतून अदा करण्यात येणार आहेत. आजवरच्या एकरकमी योजनेतून थकीत कर्ज वसुलीसाठी मिळालेला प्रतिसाद पाहता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘सलाईन’वरच राहावे लागणार आहे. कर्ज वसुलीतून देणी भागवता येत नसतील, तर बँकांच्या मालमत्तांवर टाच येणार आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने एकरकमी परतफेड योजनेचे भवितव्य अंधारात सापडले आहे. कर्ज वसुलीसाठी आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवून इतरांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ५0 पेक्षा ज्यांचे वय कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवून त्यांचा कर्ज वसुलीसाठी वापर केल्यास, त्यांची पन्नाशी ओलांडू शकते. अशावेळी त्यांची अन्य शासकीय सेवेतील दावेदारी संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे याचीही चिंता कर्मचाऱ्यांना लागली आहे. येणी-देणी समायोजनबँकांकडून शासनाला येणाऱ्या १८९७ कोटी २४ लाखांतून शासनाकडून बँकांना देणे असलेल्या ६0७ कोटी रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. मात्र, चौगुले समितीच्या शिफारशीप्रमाणे समायोजन झाले असते, तर बँकांना त्याचा अधिक फायदा झाला असता.दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणाऱ्या भू-विकास बॅँका बंद करण्याची घाई शासनाने का केली, असा प्रश्न आता कर्मचारी व शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. राज्यातील भू-विकास बॅँकाचा पसारा मोठा आहे. दुष्काळी परिस्थितीत या बॅँकांचा शेतकऱ्यांना सर्वांत जास्त लाभ झाला असता. मात्र, बॅँका बंद करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करण्याचा एक सक्षम पर्याय संपला आहे.