शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बालवैज्ञानिकांकडे शासनाचे दुर्लक्ष : शासनाचा दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:25 IST

भरत शास्त्री । बाहुबली : राज्य शासनाकडून शालेय जीवनात संशोधन करणाºया बालवैज्ञानिकांची उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. शासनाला शालेय ...

ठळक मुद्देविज्ञान प्रदर्शनांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना सवलतीचे ‘विशेष गुण’ नाहीत

भरत शास्त्री ।बाहुबली : राज्य शासनाकडून शालेय जीवनात संशोधन करणाºया बालवैज्ञानिकांची उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. शासनाला शालेय अभ्यासक्रमात विज्ञान विषय असतो आणि शालेय विद्यार्थीदेखील अनेक विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी होतात पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा जणू सरकारला विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पालक, विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे. कारण ही तसेच आहे, शासन इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा आणि कलाक्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल सवलतीचे विशेष गुण देते; पण विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये यशस्वी होणाºया बालवैज्ञानिकांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याचे चित्र आहे.

सध्या राज्यामध्ये क्रीडा आणि कला क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाºया दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळतात. क्रीडा स्पर्धांमध्ये ४९ प्रकारच्या खेळांचा समावेश आहे.जिल्हा, विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर व आंतरराष्ट्रीय स्तरावरप्रावीण्य मिळविलेल्या किंवा काही ठिकाणी तर केवळ सहभागी स्पर्धकांनादेखील सवलतीचे गुण दिले जातात.त्याचबरोबर एनसीसी व स्काऊट च्या ‘बेस्ट कॅडेट’ना देखील सवलतीचे गुण मिळतात शिवाय कलेमध्ये नाट्य, वादन, गायन, नृत्य आदी क्षेत्रांसाठी देखील सवलतीचे गुण दिले जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण मिळतात तसेच प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय शिबिरातील सहभाग व संचलन, राष्ट्रपती पदक, आंतरराष्ट्रीय युथ एक्स्चेंज प्रोग्रॅममध्ये सहभाग आदींसाठी देखील सवलतीचे गुण मिळतात.

सध्या ज्या विभागांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थ्यांना ६ वी ते १२ वी पर्यंत ज्या-त्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळविल्यास गुण मिळतात. त्यामध्ये क्रीडाक्षेत्रात ३ पासून २५ पर्यंत तर कलाक्षेत्रात ३ ते १५ पर्यंत गुण दिले जातात. हे गुण १० वी व १२ वीच्या गुणपत्रकात समाविष्ट होऊन येतात. त्यामुळे टक्केवारी वाढते त्याचा फायदा पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी होतो. पण अशी सवलत विज्ञान क्षेत्रात यश संपादन करणाºया विद्यार्थ्यांना मिळत नाही. शालेय मुले अगदी उत्साहाने शासकीय, खासगी विज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि आपली विशेष गुणवत्ताही सिद्ध करतात. त्यांना एक प्रमाणपत्र आणि पुढील टप्प्यातील स्पर्धेचे तिकीट मिळते पण हा प्रवास स्मृतिचिन्ह व सन्मानपत्रावर जाऊन थांबतो पण जर या सर्व सन्मानासोबत सवलतीचे गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेलच शिवाय आगामी काळात चांगले वैज्ञानिक तयार होण्यास मदत होईल.

 

शालेय विद्यार्थ्यांचे कल्पनाविश्व विस्तृत असते. त्यांच्याकडे भन्नाट कल्पना असतात. त्यांच्या कल्पना शक्तीला न्याय देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलतीचे गुण मिळणे आवश्यक आहे.- गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा