शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’च्या अद्ययावत उपकेंद्रासाठी सरकारने आणखी जागा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे असलेल्या सारथी संस्थेसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे असलेल्या सारथी संस्थेसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीचे पहिले उपकेंद्र कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २ एकर जागा दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे कौतुकच आहे. पण अद्ययावत उपकेंद्रासाठी आणखी जागा द्यावी, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी व्यक्त केली.

कसबा बावड्यातील 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, सारथीचे पहिले उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे, यासाठी आग्रही होतो. यानुसार शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू होत आहे. हे केंद्र अद्ययावत होणे आवश्यक आहे. यासाठी सध्या दिलेली २ एकर जागा अपुरी पडते. यामुळे आवश्यकतेनुसार ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन सरकारने द्यावी. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ साली मराठा, ओबीसी, अनुसूचित जातींसाठी देशात पहिल्यांदा आरक्षण दिले. या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने समतेचा संदेश दिला. हा संदेश घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी सरकार येथे सारथीचे उपकेंद्र सुरू केले. राज्य सरकार ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन बोलवले आहे. यामध्ये मराठा आरक्षणसंबंधी चर्चा होईल. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कमी कालावधीत समतेच्या राज्यासाठी प्रभावी असे काम केले. म्हणून राजर्षी शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालख्या आम्ही वाहत असतो. मराठा समाजाच्या मागणीनुसार सरकार येथे सारथीचे उपकेंद्र सुरू करत आहे. मराठा समाजास आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नसल्याने समाजाच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री पाटील आणि मी पुढाकार घेतला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन केल्यानंतर सरकार तातडीने सकारात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

भाजपने सहनशीलतेचा अंत पाहू नये

केंद्र सरकारने केलेल्या १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला राहिलेले नाहीत. यामुळे राज्याऐवजी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे आणि मराठा समाजास आरक्षण द्यावे, अशी विनंती पंतप्रधानांकडे करतो. भाजपने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.