शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Maratha Reservation : समाजाच्या सवलतींबाबत शुक्रवारपर्यंत भूमिका जाहीर करावी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:14 IST

Maratha Reservation : उपसमितीमुळे कोणताही लाभ मराठा समाजाला झालेला नाही. आरक्षण रद्दची नैतिक जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. सध्याची समिती बरखास्त करावी. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना या समितीवर नियुक्ती करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या सवलतींबाबत सरकारने शुक्रवारपर्यंत भूमिका जाहीर करावी अन्यथा शनिवारपासून राज्यभर आंदोलन : सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

कोल्हापूर :उपसमितीमुळे कोणताही लाभ मराठा समाजाला झालेला नाही. आरक्षण रद्दची नैतिक जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. सध्याची समिती बरखास्त करावी. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना या समितीवर नियुक्ती करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती द्याव्यात. त्याबाबतची भूमिका राज्य सरकारने शुक्रवार (दि. १४ मे) पर्यंत जाहीर करावी, अन्यथा शनिवार (दि. १५ मे) पासून राज्यभर गनिमी काव्याच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला. सन २०१४ ते २०२१ मध्ये मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी. त्यांची निवड रद्द करू नये. नवीन पदभरती करण्यात येऊ नये. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शैक्षणिक, नोकरी आदींबाबत कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबाबतची भूमिका लवकर जाहीर करावी. ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याचा निर्णय सरकारने विशेष अधिवेशनाद्वारे घ्यावे. राज्यात ठोक मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर सरकारने येऊ देऊ नये, असे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सवलतींबाबत निर्णय घेण्यास आम्ही सरकारला शुक्रवारपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची सुरुवात कोल्हापूरमधून होईल, असे सचिन तोडकर यांनी सांगितले. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता उपसमिती नेमणे म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा आहे. ही समिती बरखास्त करण्यात यावी. कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन केले जाईल, असे दिलीप पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस भगवानराव काटे, स्वप्नील पार्टे, भास्कर पाटील, नितीन देसाई, पंकज कडवकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर