शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

आपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:13 IST

कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देआपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्तावनिवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यात आपत्ती उद्भवल्यानंतर तिचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तगड्या तरुण-तरुणींची भरती केली. सुमारे ५०० आपदा मित्र नियुक्त केले. त्यांना पुरामध्ये, आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षणही दिले. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला महापुराने वेढा दिला. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सज्ज झाले.

शिवाजी पूल, शिरोळ, हातकणंगले, सांगली फाटा, तावडे हॉटेलसह शहरात आदी ठिकाणी आपदा मित्रांनी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम केले. सुमारे ९६ तरुणी धाडसाने पाण्यात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढताना दिसत होत्या. गेल्या २९ दिवसांत त्यांनी हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला. भविष्यात आपले चांगले होईल, या आशेपोटी हे आपदा मित्र नि:शुल्क अहोरात्र काम करीत आहेत.

आम्ही घरदार सोडून दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचे काम करीत आहोत; परंतु शासनाकडून आम्हाला मानधन मिळत नसल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. त्याची गांभीर्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर