शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

आपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:13 IST

कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देआपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्तावनिवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यात आपत्ती उद्भवल्यानंतर तिचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तगड्या तरुण-तरुणींची भरती केली. सुमारे ५०० आपदा मित्र नियुक्त केले. त्यांना पुरामध्ये, आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षणही दिले. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला महापुराने वेढा दिला. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सज्ज झाले.

शिवाजी पूल, शिरोळ, हातकणंगले, सांगली फाटा, तावडे हॉटेलसह शहरात आदी ठिकाणी आपदा मित्रांनी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम केले. सुमारे ९६ तरुणी धाडसाने पाण्यात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढताना दिसत होत्या. गेल्या २९ दिवसांत त्यांनी हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला. भविष्यात आपले चांगले होईल, या आशेपोटी हे आपदा मित्र नि:शुल्क अहोरात्र काम करीत आहेत.

आम्ही घरदार सोडून दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचे काम करीत आहोत; परंतु शासनाकडून आम्हाला मानधन मिळत नसल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. त्याची गांभीर्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर