शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांचा निधी शासनाने कापला!

By admin | Updated: April 18, 2015 00:02 IST

दुष्काळी फोरमचे नेते गप्प का? : ‘टेंभू’ला ७८, तर ‘ताकारी-म्हैसाळ’ला ८० कोटी

अशोक डोंबाळे - सांगली दुष्काळी फोरमचे सर्वच नेते भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी असूनही जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी मागणीपेक्षा ६० टक्के निधी कमी मिळाला आहे. यामुळे अपूर्ण सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान उभे आहे. टेंभूसाठी १८० कोटींच्या मागणीपैकी केवळ ७८ कोटी, तर ताकारी व म्हैसाळ योजनेसाठी १५२ कोटींच्या मागणीपैकी ८० कोटींचा निधी मिळाला आहे. यावर दुष्काळी फोरमचे नेते गप्प का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारमधील मंत्री दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप करून दुष्काळग्रस्त भागातील नेत्यांनी दुष्काळी फोरमची स्थापना केली होती. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व राजेंद्रअण्णा देशमुख आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्द्यावरच या नेत्यांनी भाजप-शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या. संजयकाका पाटील खासदार, तर जगताप, बाबर आमदार झाले. देशमुख, घोरपडे यांना संधी मिळाली नाही. परंतु, केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आल्यामुळे किमान दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा होती. दुष्काळग्रस्तांना वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी मुबलक निधी मिळून त्यांची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. भाजप-शिवसेना सरकारने २०१५-१६ या वर्षाचे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले. त्यात कृष्णा खोऱ्यातील सिंचन योजनांना तुटपुंज्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेंभू योजनेचा लाभ होणार आहे. आघाडी सरकारने गेल्यावर्षी ही योजना कार्यान्वित केल्यामुळे सध्या दुष्काळग्रस्तांना त्याचा फायदा झाला आहे. पण, या पाण्याचा लाभ केवळ २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनाच होत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कालव्याची कामे पूर्ण होण्याची गरज आहे. प्रशासनाने टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी १८० कोटींची मागणी केली होती. परंतु, राज्य शासनाने केवळ ७८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तो वेळेवर मिळेल, याचीही खात्री नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. २०१४-१५ वर्षात आघाडी सरकारकडून १४२ कोटी मिळाले होते. त्यावेळी दुष्काळी फोरमचे नेते अन्याय झाल्याचा आरोप करून आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टीकेचा भडीमार करीत होते. सध्या दुष्काळी फोरमचे नेते सत्तेत असताना सिंचन योजनांना निधी कमी का, यावर कोण आवाज उठविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ताकारी, म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण केलेली नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनासमोर निधीची अडचण आहे. या दोन्ही योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ताकारी आणि म्हैसाळ योजनेकडील अधिकाऱ्यांनी १५२ कोटींची मागणी केली होती. मात्र या योजनांसाठी केवळ ८० कोटींचा निधी मिळाला आहे. या तुटपुंज्या निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रत्यक्ष कामांवर खर्च किती होणार?राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या निधीतून ठेकेदारांची पूर्वीची थकित बिलेही देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कमी निधी मिळणार आहे. याशिवाय, शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मंजूर निधीला काही प्रमाणात कात्री लागल्यास सिंचन योजनांची कामे ठप्प होणार आहेत.भाजप सरकारकडून जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजना तातडीने पूर्ण होतील, अशी दुष्काळी जनतेची अपेक्षा होती. पण, सत्तेवर आल्यावर सिंचन योजनांना निधी देताना पश्चिम महाराष्ट्राला दुय्यम स्थान दिले जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपमधीलच काही नेतेही खासगीमध्ये पश्चिम महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करू लागले आहेत.