शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांचा निधी शासनाने कापला!

By admin | Updated: April 18, 2015 00:02 IST

दुष्काळी फोरमचे नेते गप्प का? : ‘टेंभू’ला ७८, तर ‘ताकारी-म्हैसाळ’ला ८० कोटी

अशोक डोंबाळे - सांगली दुष्काळी फोरमचे सर्वच नेते भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी असूनही जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी मागणीपेक्षा ६० टक्के निधी कमी मिळाला आहे. यामुळे अपूर्ण सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान उभे आहे. टेंभूसाठी १८० कोटींच्या मागणीपैकी केवळ ७८ कोटी, तर ताकारी व म्हैसाळ योजनेसाठी १५२ कोटींच्या मागणीपैकी ८० कोटींचा निधी मिळाला आहे. यावर दुष्काळी फोरमचे नेते गप्प का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारमधील मंत्री दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप करून दुष्काळग्रस्त भागातील नेत्यांनी दुष्काळी फोरमची स्थापना केली होती. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व राजेंद्रअण्णा देशमुख आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्द्यावरच या नेत्यांनी भाजप-शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या. संजयकाका पाटील खासदार, तर जगताप, बाबर आमदार झाले. देशमुख, घोरपडे यांना संधी मिळाली नाही. परंतु, केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आल्यामुळे किमान दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा होती. दुष्काळग्रस्तांना वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी मुबलक निधी मिळून त्यांची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. भाजप-शिवसेना सरकारने २०१५-१६ या वर्षाचे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले. त्यात कृष्णा खोऱ्यातील सिंचन योजनांना तुटपुंज्या निधीची तरतूद करून दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेंभू योजनेचा लाभ होणार आहे. आघाडी सरकारने गेल्यावर्षी ही योजना कार्यान्वित केल्यामुळे सध्या दुष्काळग्रस्तांना त्याचा फायदा झाला आहे. पण, या पाण्याचा लाभ केवळ २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनाच होत आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कालव्याची कामे पूर्ण होण्याची गरज आहे. प्रशासनाने टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी १८० कोटींची मागणी केली होती. परंतु, राज्य शासनाने केवळ ७८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तो वेळेवर मिळेल, याचीही खात्री नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. २०१४-१५ वर्षात आघाडी सरकारकडून १४२ कोटी मिळाले होते. त्यावेळी दुष्काळी फोरमचे नेते अन्याय झाल्याचा आरोप करून आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टीकेचा भडीमार करीत होते. सध्या दुष्काळी फोरमचे नेते सत्तेत असताना सिंचन योजनांना निधी कमी का, यावर कोण आवाज उठविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ताकारी, म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण केलेली नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनासमोर निधीची अडचण आहे. या दोन्ही योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ताकारी आणि म्हैसाळ योजनेकडील अधिकाऱ्यांनी १५२ कोटींची मागणी केली होती. मात्र या योजनांसाठी केवळ ८० कोटींचा निधी मिळाला आहे. या तुटपुंज्या निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रत्यक्ष कामांवर खर्च किती होणार?राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या निधीतून ठेकेदारांची पूर्वीची थकित बिलेही देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कमी निधी मिळणार आहे. याशिवाय, शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मंजूर निधीला काही प्रमाणात कात्री लागल्यास सिंचन योजनांची कामे ठप्प होणार आहेत.भाजप सरकारकडून जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजना तातडीने पूर्ण होतील, अशी दुष्काळी जनतेची अपेक्षा होती. पण, सत्तेवर आल्यावर सिंचन योजनांना निधी देताना पश्चिम महाराष्ट्राला दुय्यम स्थान दिले जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपमधीलच काही नेतेही खासगीमध्ये पश्चिम महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करू लागले आहेत.