शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

महापालिकेच्या कामांवर सरकारचे नियंत्रण : चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:24 IST

कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी

ठळक मुद्देखासगी एजन्सी नेमून घेणार सरकारी निधीचा लेखाजोखापुढील काळात सुरू होणाºया विकासकामांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करून माहिती

कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी नेमून त्यांच्याकडून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर कामाचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. शनिवारी महानगरपालिकेत झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच तसे जाहीर केले.

पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी महानगरपालिकेत जाऊन शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सध्या सुरू असलेल्या आणि पुढील काळात सुरू होणाºया विकासकामांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करून माहिती दिली. यावेळी सर्व अधिकारी, भाजप-ताराराणी आघाडीचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

एकदा निधी दिला की आपले दायित्व संपले, अशी सरकारची भावना होत होती; पण त्यामुळे कामे रेंगाळतात. खर्च वाढतो. परिणामी ती अर्धवट सोडली जातात; म्हणूनच काम झाले की नाही, निधी योग्य प्रकारे खर्च झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमून तिच्याकडून कामांचा लेखाजोखा घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

ही एजन्सी ‘डीपीडीसी’मार्फत नेमणार की राज्य सरकारमार्फत हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. राज्य सरकारशी संबंधित कामांचा आढावा घेण्याकरिता महापालिकेच्या प्रशासनाने मंत्रालयासाठी एक खास अधिकारी नेमावा आणि या अधिकाºयास सोमवार ते बुधवार मुंबईत पाठपुरावा करण्यास सांगावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.नगरोत्थानची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करून नवीन कामांचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांनी केली. थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण करण्याकरिता दोन स्वतंत्र अधिकारी लवकरच दिले जातील; परंतु ही योजना मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या, असेही त्यांनी अधिकाºयांना बजावले.बैठकीस महापालिकेच्या सर्व अधिकाºयांसह आमदार अमल महाडिक, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते विजय सूर्यवंशी, सुनील कदम, ईश्वर परमार, किरण नकाते, अजित ठाणेकर उपस्थित होते.दादांनी पत्रकारांना टाळलेपालकमंत्री म्हणून प्रथमच महानगरपालिकेत गेलेल्या चंद्रकांतदादांच्या बैठकीकडे पत्रकारांचे विशेष लक्ष होते; परंतु पत्रकारांना या बैठकीपासून दूर ठेवून बैठक संपल्यानंतर माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले; पण बैठक संपल्यानंतर दादा खोलीतून बाहेर पडले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हाक मारून विनंती केली; पण त्यांनी पत्रकारांकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. पत्रकारांना टाळत दादा तडक निघून गेले. नंतर आमदार अमल महाडिक यांनी बैठकीतील वृत्तांत सांगितला.अस्वस्थ दादांचे फोनवरील बोलणेबैठक सुरू झाल्यापासून पालकमंत्री पाटील काहीसे अस्वस्थ दिसत होते. अर्ध्या तासाच्या बैठकीत त्यांना पाच ते सहा फोन आले. त्यावर त्यांचे बोलणे सुरू होते. एकदा तर बैठकीतील खुर्ची मागे ढकलून एका कोपºयात ते फोनवर बोलत राहिले. त्यामुळे त्यांचे अर्धे लक्ष फोनकडे, तर अर्धे लक्ष बैठकीतील चर्चेकडे राहिले. फोनवरील बोलण्यानंतर ते अस्वस्थ आणि चलबिचल झाले होते. गडबडीत बैठक संपवून ते निघूनही गेले.२७५ कोटींचा आराखडानगरोत्थान योजनेतून सुरू असलेली रस्त्यांची कामे गेल्या आठ-नऊ वर्षांपासून रखडली आहेत. ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, तसेच नवीन रस्ते करण्याकरिता २७५ कोटींचा आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी बैठकीत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारण