शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video

By भारत चव्हाण | Updated: July 15, 2024 16:24 IST

'अतिरेक्याचे गडावर वास्तव्य, त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये'

कोल्हापूर : विशाळगडावर रविवारी जी घटना घडली त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागला होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहेत. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्या पुरोगामीत्वावर संशय घेतला. त्यांनी मला पुरोगामीत्व शिकविण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात संभाजीराजे यांनी मुश्रीफ यांना फटकारले आहे. पालकमंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. माझ्या पुरोगामीत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. माझा जन्मच छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यात झाला आहे. मुश्रीफांनी त्यांच्या पोरानं पैशाचं काय केले, कारवाईला घाबरुन पक्ष बदललले यावर बोलावे, असे संभाजीराजे म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही. शिवभक्त मोठ्या संख्येने येणार आहेत हे माहित असतानाही जिल्हा प्रशासनाने यंत्रणाला का लावली नाही. तुम्ही अतिक्रमण का काढले नाही. मला त्या ठिकाणी का पोहचू दिले असे सवाल करत संभाजीराजे यांनी जिल्हा प्रशासनालाही झोडपले.

अतिरेक्याचे गडावर वास्तव्य पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन भटकळ विशाळगडावर येऊन वास्तव्य केले, त्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी पालकमंत्री महाशय कोठे होते? त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. विशाळगडावरील अतिक्रमणाला कोणाचा पाठिंबा होता, प्रशासनावर कोणाचा दबाव होता हे लपून राहिलेले नाही. म्हणून काल जी दंगल घडली त्याच्या खोलात निश्चितपणे जावे, असेही ते म्हणाले.आंदोलनात उशिरा उतरलो याची खंतविशाळगडावरील अतिक्रमणाबाबत मला उशीरा कळले. आंदोलनात उशीरा उतरलो. सहा वर्ष खासदार होतो, पण त्यावेळी मी तिकडे गेलो नाही याची मला खंत वाटते, असे संभाजीराजे म्हणाले.संभाजीराजेंची हतबलतासर्वच सरकारांवर संभाजीराजे यांनी हल्लाबोल केला असून त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. गडकोट किल्ल्यांना ४५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही घडले नाही. सर्वच गडावरील अतिक्रमणाला आतापर्यंत आलेली सरकारे जबाबदार आहेत. रायगडावरील विकास कामात एक टक्का कमिशन खाऊ दिले नाही. प्रामाणिकपणे काम करत आहे. गडकोट किल्ल्यांसाठी मी लढतो हे नको असेल तर मला सांगा. मी थांबतो. मला सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागला आहे. गडकोटांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून मी त्रासून गेलो आहे. अशा उद्वीग्न भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.त्याचा शोध घेईनमाझ्या खांद्यावर कोणी बंदूक ठेऊन घटना घडवून आणत असेल तर त्याचा नक्की विचार करीन, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन, सरकारच्या उदासिन भूमिकेनंतर घडलेल्या घटनेवर शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले जाणार असतील तर पहिला माझ्यावर गुन्हा नोंदवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती