शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video

By भारत चव्हाण | Updated: July 15, 2024 16:24 IST

'अतिरेक्याचे गडावर वास्तव्य, त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये'

कोल्हापूर : विशाळगडावर रविवारी जी घटना घडली त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागला होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहेत. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्या पुरोगामीत्वावर संशय घेतला. त्यांनी मला पुरोगामीत्व शिकविण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात संभाजीराजे यांनी मुश्रीफ यांना फटकारले आहे. पालकमंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. माझ्या पुरोगामीत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. माझा जन्मच छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यात झाला आहे. मुश्रीफांनी त्यांच्या पोरानं पैशाचं काय केले, कारवाईला घाबरुन पक्ष बदललले यावर बोलावे, असे संभाजीराजे म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही. शिवभक्त मोठ्या संख्येने येणार आहेत हे माहित असतानाही जिल्हा प्रशासनाने यंत्रणाला का लावली नाही. तुम्ही अतिक्रमण का काढले नाही. मला त्या ठिकाणी का पोहचू दिले असे सवाल करत संभाजीराजे यांनी जिल्हा प्रशासनालाही झोडपले.

अतिरेक्याचे गडावर वास्तव्य पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन भटकळ विशाळगडावर येऊन वास्तव्य केले, त्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी पालकमंत्री महाशय कोठे होते? त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. विशाळगडावरील अतिक्रमणाला कोणाचा पाठिंबा होता, प्रशासनावर कोणाचा दबाव होता हे लपून राहिलेले नाही. म्हणून काल जी दंगल घडली त्याच्या खोलात निश्चितपणे जावे, असेही ते म्हणाले.आंदोलनात उशिरा उतरलो याची खंतविशाळगडावरील अतिक्रमणाबाबत मला उशीरा कळले. आंदोलनात उशीरा उतरलो. सहा वर्ष खासदार होतो, पण त्यावेळी मी तिकडे गेलो नाही याची मला खंत वाटते, असे संभाजीराजे म्हणाले.संभाजीराजेंची हतबलतासर्वच सरकारांवर संभाजीराजे यांनी हल्लाबोल केला असून त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. गडकोट किल्ल्यांना ४५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही घडले नाही. सर्वच गडावरील अतिक्रमणाला आतापर्यंत आलेली सरकारे जबाबदार आहेत. रायगडावरील विकास कामात एक टक्का कमिशन खाऊ दिले नाही. प्रामाणिकपणे काम करत आहे. गडकोट किल्ल्यांसाठी मी लढतो हे नको असेल तर मला सांगा. मी थांबतो. मला सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागला आहे. गडकोटांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून मी त्रासून गेलो आहे. अशा उद्वीग्न भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.त्याचा शोध घेईनमाझ्या खांद्यावर कोणी बंदूक ठेऊन घटना घडवून आणत असेल तर त्याचा नक्की विचार करीन, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन, सरकारच्या उदासिन भूमिकेनंतर घडलेल्या घटनेवर शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले जाणार असतील तर पहिला माझ्यावर गुन्हा नोंदवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती