शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रस्ताव रद्दवर अखेर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:20 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रस्ताव रद्दवर अखेर शिक्कामोर्तबसंचालक मंडळाची बैठक : नोकर भरतीवरही झाली चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.‘गोकुळ’ मल्टिस्टेटच्या ठरावावरून गेले वर्षभर जिल्ह्याचे राजकारण धूमसत आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटले. संघाची मागील सर्वसाधारण सभा या विषयावरून वादळी झाली तरीही संचालक मंडळाने महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची परवानगी घेऊन प्रस्ताव केंद्रीय निबंधकांकडे पाठविला होता; पण ३० आॅक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करून जाब विचारण्याची तयारी विरोधकांनी केली होती.

अखेर सभेच्या अगोदर दोन दिवस अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दूध उत्पादकांची भावना लक्षात घेऊन मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. सर्वसाधारण सभेतही त्यांनी तसे जाहीर केले आणि बुधवारच्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय चर्चेला ठेवला. त्यावर बुधवारी सविस्तर चर्चा होऊन अध्यक्ष आपटे यांनी दिलेल्या पत्रास मान्यता देण्यात आली.संचालक मंडळाची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्त होणाऱ्या जागांचा अंदाज घेऊन गरजेनुसार नोकरभरती करण्याबाबतही चर्चा झाली.माजी अध्यक्षांना आता ‘मल्टिस्टेट’ नकोचदूधवाढ हा जरी मल्टिस्टेट मागचा हेतू सांगितला जात असला तरी संघाची सत्तासूत्रे ताब्यात ठेवण्याचा सत्तारूढ गटाचा उद्देश त्यामागे लपून राहिला नव्हता; पण विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता मल्टिस्टेट नकोच, अशी भूमिका माजी अध्यक्षांनी घेतल्याचे समजते.

मल्टिस्टेटबाबत केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यास बुधवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.- रवींद्र आपटे,अध्यक्ष, ‘गोकुळ’

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर